दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-विजेच्या पोलवर करंट उतरला; सहा वर्षीय मुलीचा मृत्यू ! महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावल्याची नातेवाईकांची संतप्त भावना

 विजेच्या पोलवर करंट उतरला; सहा वर्षीय मुलीचा मृत्यू !



महावितरणच्या गलथान कारभारामुळे जीव गमावल्याची नातेवाईकांची संतप्त भावना

परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      

        महावितरणच्या गलथान कारभाराचा नमुना नेहमीच बघायला मिळतो परंतु या गलथान कारभारतून एका सहा वर्षीय चिमुकलीला आपला जीव गमवावा लागल्याची दुर्देवी घटना आज दिनांक 9 रोजी दुपारी 03:45 च्या सुमारास घडली आहे. या घटनेने नागरिक संतप्त झाले असून वारंवार सांगूनही करंट उतरणाऱ्या पोलची दुरुस्ती केले नसल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.

       याबाबत प्राप्त माहिती अशी की, महावितरण कार्यालयाच्या अगदी पाठीमागील बाजूस असलेल्या हबीब पुरा भागातील रस्त्यावर असलेल्या विजेच्या सार्वजनिक खांबावर गेल्या अनेक दिवसापासून करंट उतरत असल्याचे नागरिकांनी महावितरण कर्मचारी व कार्यालयाला वारंवार कळवले. या भागातील नागरिक नेहमी या खांबा पासून दूर राहत असत मात्र आज अतिशय दुर्दैवी घटना घडली असून या भागातील एक छोटी सहा वर्षीय मुलगी या खांबाला संपर्कात आली व करंट बसल्याने तिला आपला जीव गमवावा लागला. या बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. गौरी वैजनाथ घोटकर,वय ६ वर्षे असे या मयत मुलीचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेनंतर या भागातील नागरिकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या असून महावितरणच्या गलथान कारभाराने या मुलीला आपला जीव गमवावा लागल्याची चीड नागरिक व्यक्त करीत आहेत.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....