संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

 शासनाच्या शिक्षक कर्मचारी काव्यवाचन स्पर्धेत परळीचा डंका



कवी दिवाकर जोशी यांची कविता राज्यातून द्वितीय

परळी: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनीवारी संगमनेर जि.अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील आठ विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाळीस दर्जेदार कवींच्या स्वरचीत कवितांच्या सादरीकरणातून द्वितीय क्रमांकाने कासारवाडी ति.परळीचे शिक्षक आणि सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या गझलेची राज्यातील सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये निवड करण्यात आली.

केंद्र स्तर, तालुकास्तर. विभाग स्तर आणि राज्यस्तर असे टप्पे यशस्वीरित्या पार करत दिवाकर जोशी यांची  'विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो' ही गझल महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे

त्यांच्या या यशाबद्दल परळीचे गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय कोकणे, केंद्रप्रमुख श्री श्याम सातपुते, कासारवाडी चे मुख्याध्यापक श्री आत्माराम आघाव, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री विजयजी वाकेकर, प्रा. राजकुमार यल्लावाड, प्रा. अरुण पवार,शाहीर अनंत मुंडे, प्रा. संजय आघाव, प्रा. सिद्धार्थ तायडे, पत्रकार रानबाजी गायकवाड, कवी बालाजी कांबळे, कवी सिद्धेश्वर इंगोले, श्री सुनील फुलारी, श्री बंडू आघाव, श्री किरण आटोळकर आणि तालुक्यातील सर्व शिक्षक, साहित्यिक मंडळींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!