मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

 शासनाच्या शिक्षक कर्मचारी काव्यवाचन स्पर्धेत परळीचा डंका



कवी दिवाकर जोशी यांची कविता राज्यातून द्वितीय

परळी: महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्यामार्फत शिक्षक कर्मचारी व अधिकारी यांच्यासाठी राज्यस्तरीय स्वरचित काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनीवारी संगमनेर जि.अहिल्यानगर येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील आठ विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या चाळीस दर्जेदार कवींच्या स्वरचीत कवितांच्या सादरीकरणातून द्वितीय क्रमांकाने कासारवाडी ति.परळीचे शिक्षक आणि सुप्रसिद्ध गझलकार दिवाकर जोशी यांच्या गझलेची राज्यातील सर्वोत्कृष्ट कवितांमध्ये निवड करण्यात आली.

केंद्र स्तर, तालुकास्तर. विभाग स्तर आणि राज्यस्तर असे टप्पे यशस्वीरित्या पार करत दिवाकर जोशी यांची  'विठ्ठल मला निरंतर विद्यालयात दिसतो' ही गझल महाराष्ट्रात सर्वोत्कृष्ट ठरली आहे

त्यांच्या या यशाबद्दल परळीचे गटशिक्षणाधिकारी श्री गणेश गिरी, शिक्षण विस्तार अधिकारी श्री दत्तात्रय कोकणे, केंद्रप्रमुख श्री श्याम सातपुते, कासारवाडी चे मुख्याध्यापक श्री आत्माराम आघाव, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री विजयजी वाकेकर, प्रा. राजकुमार यल्लावाड, प्रा. अरुण पवार,शाहीर अनंत मुंडे, प्रा. संजय आघाव, प्रा. सिद्धार्थ तायडे, पत्रकार रानबाजी गायकवाड, कवी बालाजी कांबळे, कवी सिद्धेश्वर इंगोले, श्री सुनील फुलारी, श्री बंडू आघाव, श्री किरण आटोळकर आणि तालुक्यातील सर्व शिक्षक, साहित्यिक मंडळींनी अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....