इमेज
  परळी वैजनाथमध्ये जनक्षोभ; अल्पवयीन मुलींवरील अत्याचारा विरोधात परळीत ‘रास्ता रोको’ परळी वैजनाथ (प्रतिनिधी) राज्यात अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आणि हत्येच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ सोमवार दि. ४ मे रोजी परळी वैजनाथ येथील छत्रपती संभाजी महाराज चौक (ईटके कॉर्नर) येथे नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेत ‘रास्ता रोको’ आंदोलन केले. पुण्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या अमानवीय अत्याचार आणि हत्येच्या घटनेचे पडसाद आज परळीत उमटले असून, दोषींना तात्काळ फाशी देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबत भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना महसूल प्रशासना मार्फत निवेदन देण्यात आले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास शहरातील मुख्य चौकात मोठ्या प्रमाणात नागरिक, महिला आणि तरुण एकत्र आले. आंदोलकांनी रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यावेळी आंदोलकांनी राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.           अल्पवयीन मुलींवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कोणत्याही परिस्थितीत दया न दाखवता भरचौकात फाशी द्यावी., प्रलंबित असलेला...

परळीत उत्साहात कामगार मेळावा

 असंघटित कामगारांना किमान ३० हजार रुपये वेतन मिळाले पाहिजे; कॉम्रेड किरण मोघे यांचे प्रतिपादन



परळीत उत्साहात कामगार मेळावा

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

      असंघटित क्षेत्रातील कामगारांना किमान वेतन म्हणून दरमहा ३० हजार रुपये मिळालेच पाहिजेत, ही 'सीटू'ची आग्रही भूमिका आहे, असे प्रतिपादन सीटू महाराष्ट्र राज्य सचिव कॉ. किरण मोघे यांनी केले. बीड जिल्हा सीटूच्या वतीने जागतिक कामगार दिनानिमित्त परळी येथील विठ्ठल मंदिर परिसरात आयोजित कामगार मेळाव्यात त्या बोलत होत्या..

         मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्रा. बी. जी. खाडे होते. यावेळी व्यासपीठावर आशा संघटनेच्या नेत्या कॉ. किरण सावजी, जालिंदर गिरी, सुनिता ताटे, शालेय पोषण आहार संघटनेचे नेते कॉ. प्रभाकर नागरगोजे आणि सुवर्णा रेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मार्गदर्शन करताना कॉ. किरण मोघे म्हणाल्या की, १८८९ साली शिकागो येथील कामगारांच्या आंदोलनावर गोळीबार झाला होता. त्या बलिदानातून आणि कामगारांच्या प्रखर लढ्यातूनच '८ तास काम' असा जागतिक नियम ठरवण्यात आला. या लढ्याची आठवण म्हणून १ मे हा दिवस 'कामगार दिन' म्हणून साजरा केला जातो. मात्र, आजही देशात आशा व अंगणवाडी सेविकांसह अनेक कामगारांना १२ तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. मोदी सरकारने आपल्या उद्योगपती मित्रांसाठी कामगार कायद्यात बदल करून चार कामगार संहिता आणल्या आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

      आपल्या भाषणात त्यांनी कॉ. पानसरे यांच्या 'शिवाजी कोण होता' या पुस्तकाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या की, "शिवाजी महाराज हे रयतेचे राज्य निर्माण करणारे लोककल्याणकारी राजा होते. समाजात धर्माच्या नावावर फूट पाडणाऱ्या शक्तींना विरोध करणे हीच खरी लोकशाहीची मूल्ये आहेत."

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. शेख जावेद यांनी केले, तर सूत्रसंचालन कॉ. प्रकाश वाघमारे यांनी केले. उपस्थितांचे आभार कॉ. नवाब मोमीन यांनी मानले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी बाबा शेख ,शेख फिरोज, संजय कसबे, पद्मीन रणदिवे, यमुना पाथरकर, अश्विनी कसबे, सुमित्रा सावंत आणि आशा लोडगे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....