मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा उपक्रम

इमेज
  आजपासून वारकऱ्यांच्या 'चरण सेवेला' प्रारंभ: भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची ! मुंबई : दि.१:आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे.  राज्यातील ११ जिल्ह्यांतील पालखी मार्गावरील सुमारे ४०० मुक्कामस्थळी हा उपक्रम राबविण्यात येणार असून, १२ हजारांहून अधिक डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. वारकऱ्यांच्या पायांवरील ताण कमी करण्यासाठी सुमारे ३ हजार लिटर औषधी आयुर्वेदिक तेलाद्वारे पायांची मालिश, फिजिओथेरपी, प्राथमिक उपचार, वैद्यकीय तपासणी तसेच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संबंधित रुग्णालयात संदर्भित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गरजेनुसार रुग्णवाहिका सेवाही सज्ज ठेवण्यात आली आहे. याशिवाय, पालखी मार्गावर ८ आरोग्य जनजागृती रथांच्या माध्यमातून केंद्...

प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून नवीन मार्गदर्शक तत्वे जारी

विधानपरिषदेत विविध आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर ना. पंकजा मुंडे यांची अभ्यासपूर्ण उत्तरे




पुण्यातील रेडीमिक्स काँक्रीट प्रकल्पांवर प्रदूषण नियंत्रणासाठी कठोर अंमलबजावणी 

मुंबई, दि. १ : 

पुणे शहरातील रेडीमिक्स काँक्रीट (RMC) प्रकल्पांमधून मुठा नदीचे प्रदूषण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे बैठक घेऊन नदी पुनर्जीवन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (STP) तसेच आरएमसी प्रकल्पांच्या प्रदूषण नियंत्रण उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर सातत्याने कारवाई केली जात असून, यापुढेही नियमित बैठका घेऊन परिस्थितीवर लक्ष ठेवले जाईल, असे पर्यावरण मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी सभागृहात सांगितले.


   विधानपरिषद सदस्य परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरील चर्चेत डॉ. नीलम गोऱ्हे, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी सहभाग घेतला, त्यावर उत्तर देताना त्या बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या की, पुण्यातील १०५ आरएमसी प्रकल्पांपैकी सर्व प्रकल्प बंद करण्यात आलेले नसून, केवळ नियमांचे पालन न करणारे, बेकायदेशीरपणे कार्यरत किंवा प्रदूषण नियंत्रणाच्या अटींचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांवरच कारवाई करण्यात आली आहे.


महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ (MPCB) ने आरएमसी प्रकल्पांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार सर्व प्रकल्पांना बंदिस्त (बॉक्स कव्हर) व्यवस्था, धूळ नियंत्रणासाठी स्प्रिंकलर, वाहनांच्या टायर धुण्याची व्यवस्था आणि इतर प्रदूषण नियंत्रण उपाययोजना बंधनकारक करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन न करणाऱ्या प्रकल्पांवर कठोर कारवाई केली जाईल.


मुठा नदीच्या प्रदूषणासाठी केवळ आरएमसी प्रकल्पच जबाबदार नसून स्थानिक स्वराज्य संस्थांकडून होणारे सांडपाणी हेही मोठे कारण असल्याचे नमूद करत त्यांनी सांगितले की, नदी प्रदूषण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर एसटीपी उभारण्याचे काम सुरू आहे. पाण्याच्या गुणवत्तेचे ऑनलाईन निरीक्षणही करण्यात येत आहे, असेही मंत्री श्रीमती मुंडे यांनी नमूद केले.


पर्यावरण विभागाकडून प्रदूषण करणाऱ्या उद्योगांना वेळोवेळी नोटिसा दिल्या जात असून, नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच प्रदूषण नियंत्रण अधिक प्रभावी करण्यासाठी उद्योगांच्या बँक गॅरंटीची रक्कम वाढविण्याबाबत समितीमार्फत धोरण तयार करण्यात येत असून, अल्पकालीन, मध्यमकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समावेश असलेले व्यापक धोरणही तयार करण्यात येत असल्याचे मंत्री श्रीमती मुंडे यांनी सांगितले.


*कानगाव–पाटस सिमेंट प्रकल्पांमुळे वाढलेल्या प्रदूषणावर कारवाई*

------

कानगाव–पाटस या भागातील सिमेंट प्लांट असलेल्या कंपन्यांची महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळोवेळी तपासणी केली आहे. आतापर्यंत किमान सात वेळा निरीक्षण करण्यात आले असून अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. नियमभंग करणाऱ्या कंपन्यांना नोटीसही देण्यात आली आहे, अशी माहिती पंकजाताई मुंडे यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य सदाभाऊ खोत यांनी यासंदर्भात प्रश्न मांडला होता.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या