MB NEWS-वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन
वारीला गेलेल्या बळीराम राऊत यांचे अपघाती निधन
सातोना/पांडुरंग शिंदे....
परतुर तालुक्यातील अंगलगाव येथील बळीराम काशिनाथ राऊत यांचे अपघाती निधन झाले आहे. पंढरपूर येथे वारीहून परतत असताना पंढरपूर येथील पोलीस स्टेशन समोर अचानक येणाऱ्या भरधाव कार ने धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोक्याला मार लागला होता. पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दोन दिवस उपचार सुरू होते. दरम्यान दि. 13 जुलै रोजी रात्री दहा वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचा अंत्यविधी अंगलगाव येथे दिनांक 14 जुलै रोजी करण्यात आला. त्यांच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.बळीराम राऊत हे मनमिळाऊ स्वभावाचे असल्याने सर्व परिचित होते.
त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी असा परिवार आहे. राऊत कुटुंबाच्या दु:खात माजी आमदार बबनराव लोणीकर सहभागी झाले. त्यांनी शोक व्यक्त केला. तसेच पदाधिकारी पत्रकार पांडुरंग शिंदे, भाजप कार्यकर्ते रंगनाथ.रेंगे पाटील, सरपंच आप्पासाहेब खंदारे, शांतारामजी शिंदे ,रामप्रसाद शिंदे, निवृत्ती शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा