परळी वैजनाथ: खामगाव येथील एका शेतकऱ्याची आत्महत्या
परळी वैजनाथ।प्रतिनिधी
परळी तालुक्यातील खामगाव येथे एका शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज(दि.३) सकाळी उघडकीस आली. प्रल्हाद अंकुश बडे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
मागील काही वर्षांपासून त्यांना सततच्या नापिकी, वाढता उत्पादन खर्च आणि कर्जाचा डोंगर यामुळे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत होता. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, या चिंतेत ते नेहमीच असत असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. याच विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच सिरसाळा पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र सिरसाळा येथे शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.दरम्यान प्राथमिक माहितीनुसार ही आत्महत्या अर्थिक विवंचनेतून झाली असल्याचे बोलले जात आहे मात्र आत्महत्येचे कारण अधिक तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा