इमेज
  नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा - गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण आरएसएसचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले.  या डायग्नोस्टिक सेंटरच्या उभारणीसाठी आमदार संदीप जोशी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेल्या परिश्रमांचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुक केले. तसेच अल्पावधीत उभ्या राहिलेल्या केंद्राला स्व. गंगाधरराव फडणवीस यांचे नाव देण्यात आले असून वडिलांच्या कार्याचा आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडल्याचे आणि त्यांच्याकडून समाजकार्याची प्रेरणा मिळाल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या डायग्नोस्टिक सेंटरमध्ये आरोग्य तपासण्यांसाठीची आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध असून लोकांना माफक दरात आरोग्यसेवा दिली जाणार आहे. तसेच राज...

समीर येळंबकर, ठाणे यांचा विशेष लेख...

 ग्रामीण माणुसकीचा दरारा हरपला : अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली




आजच्या दुर्दैवी विमान अपघातात अजित दादा आपल्यातून गेले. काळाने राज्यातील एका उमद्या, कणखर आणि स्पष्टवक्त्या नेत्याला आपल्यातून हिरावून नेले आणि संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली.

शरद पवार साहेबांसारख्या दिग्गज नेत्यांचे पुतणे असल्यामुळे राज्याचे व्यापक राजकारण, नेते, प्रशासन व्यवस्था, सामान्य जनता आणि त्यांच्या प्रश्नांचा अनुभव त्यांना लहानपणापासूनच जवळून घेता आला. त्यामुळे राजकारणात आल्यानंतर पक्षात आणि नेतृत्वात लवकर स्थान मिळणे शक्य झाले, हे खरे असले तरी पुढे त्यांनी केवळ वारसा म्हणून नव्हे, तर मेहनत, कष्ट आणि ठाम भूमिकेच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली.

काकांमुळे संधी मिळाली, पण जेव्हा एखाद्या विषयावर पक्षाची भूमिका मनाला पटली नाही, तेव्हा त्यांनी ती निर्भीडपणे मांडली. अगदी शेवटी काकांपासून वेगळे होण्याचा कठीण निर्णय घ्यावा लागला, तरीही त्यांनी मनाविरुद्ध, न पटणारे काम कधीच केले नाही.

स्वतःला न पटणारी कामे त्यांनी रोकठोक नाकारली. ज्यांच्याशी विचार जुळत नाहीत, त्यांच्याशी अनावश्यक जवळीक ठेवण्याची भूमिका त्यांनी कधीच स्वीकारली नाही. “होण्यासारखे असेल तरच हो म्हणायचे, अन्यथा नियमानुसार किंवा माझ्याकडून हे शक्य नाही,” असे स्पष्ट सांगणारा असा नेता महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच.

ग्रामीण भागातून मुंबईसारख्या महानगरात येऊनही, देश-विदेशात फिरूनही, त्यांनी आपली ग्रामीण ओळख कधीही लपवली नाही. ते कायम खेड्या-पाड्यातील सामान्य लोकांचे नेते राहिले. ग्रामीण भाषेतील शिवराळ शब्द, म्हणी भाषणात वापरण्याच्या त्यांच्या सवयीमुळे त्यांना अनेकदा तीव्र टीकेला सामोरे जावे लागले, पण तरीही ते आपल्या लोकांमध्ये, आपल्या मातीमध्येच रमले. शहरीपणा त्यांनी कधी अंगीकारला नाही.

प्रशासनातील मोठ्या अधिकाऱ्यांवर त्यांचा प्रचंड दरारा होता आणि पक्षातही त्यांनी आपली शिस्त आणि धाक कायम ठेवला. इतके ऐश्वर्य हाताशी असतानाही त्यांनी साधेपणा जपला. कोणतेही व्यसन नव्हते. तंबाखू, गुटखा यांचा त्यांना तीव्र तिटकारा होता आणि इतरांनाही त्यापासून दूर राहण्याचा आग्रह ते नेहमी धरत.

रात्री दहा–साडेदहा वाजता झोपून सकाळी सात वाजता पक्षातील नेत्यांना बंगल्यावर भेटणारे, सकाळी नऊ ते अकरा कार्यकर्त्यांसाठी वेळ देणारे आणि नंतर दिवसभर मंत्रालयात कामात गुंतलेले असे दादांसारखे नेते खरोखरच दुर्मीळ.

सामान्य नागरिक म्हणून आपला त्यांच्याशी थेट संपर्क येत नसला, तरी त्यांचा नेता म्हणूनचा प्रवास आपण रोज पाहत, वाचत असतो. त्यामुळे असे लोकनेते आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनतात. त्यांच्या अकाली, अचानक जाण्याने जणू घरातीलच एखादी व्यक्ती गेल्यासारखे दुःख मनाला चटका लावून जाते.अशा या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.

दादांची आठवण कायम आपल्या मनात जिवंत राहील. 💐💐

समीर येळंबकर, ठाणे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!