अंतिम काव्यमय भावना :जीवनातील 'मरणयातना' मांडत पत्करले 'मरण'

इमेज
"केली शिकार माझी, माझ्याच सद्गुणांनी, काटे कुठेच नव्हते, केला दगा फुलांनी!!" कौटुंबिक दु:ख अन् पती -पत्नीच्या नात्यांमधील बेवफाईने त्रासून माध्यकर्मी युवकाने  केली आत्महत्या परळी वैजनाथ, प्रतिनिधी...          परळी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून युवकानं टोकाचं पाऊल उचललं आहे. फेसबूक पोस्ट करत युवकानं आपलं जीवन संपवलं आहे. रामेश्वर गव्हाणे असं या युवकाचं नाव असून, तो परळी तालुक्यातील नागापूर येथील आहे. पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याची माहिती त्याने पोस्टमध्ये दिली आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.          परळी तालुक्यातील नागापूर येथील रामेश्वर गव्हाणे यांनी आपल्या शेतात औषध घेऊन गळफास घेत जीवन संपलं आहे. या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. रामेश्वर याने जीवन संपवण्यापूर्वी फेसबुकवर पोस्ट केली. यामध्ये त्यांने त्याची पत्नी नातेवाईकांपासून त्रास असल्याचे लिहिले आहे. तसेच या पोस्टमध्ये काही डॉक्टर आणि वकिलांच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात आला...

आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेभाऊ फड

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडा: परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे आज रास्ता रोको 




परळी/प्रतिनिधी

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याच्या मागणीसाठी परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या आंदोलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस तथा कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे.

कन्हेरवाडी साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडण्याची  मागणी आता जोर धरू लागली आहे. पाण्याअभावी या भागातील जलाशय कोरडेठाक पडले आहेत. जनावरांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. हा साठवण तलाव अतिशय डोंगराळ भागात असल्याने येथून टँकरने पाणी पुरवठा करणे शक्य होत नाही. त्यामुळे पाणी नदीपात्रात सोडणे हा एकमेव पर्याय आहे.

या साठवण तलावातील पाणी नदीपात्रात सोडल्यास याचा फायदा परिसरातील गावांना होतो. कन्हेरवाडी, जिरेवाडी, ब्रम्हवाडी, जलालपूर, बँक कॉलनी, समता नगर, शंकर पार्वती नगर आदी भागातील जळ पातळीत वाढ होऊन दुष्काळी परिस्थितीपासून दिलासा मिळणार आहे.

या आग्रही मागणीसाठी कन्हेरवाडी व परिसरातील नागरीक ग्रामस्थांच्या वतीने परळी - अंबेजोगाई महामार्गावर जिरेवाडी बायपास येथे होणाऱ्या रास्ता रोको आंदोलनास आंदोलनास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस व कन्हेरवाडीचे माजी सरपंच राजेभाऊ फड यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!