मोहा येथील घटनेने बीडमध्ये हळहळ
बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील कार्यक्रम राबविणार - माधव बावगे
खरात प्रकरणात सामाजिक संघटनां आणि महिलांनी रस्त्यावर उतरले पाहिजे - संजय बनसोडे
परळी / प्रतिनिधी .....
सध्या महाराष्ट्रात भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाने धर्माच्या नावावर धर्माच्या नावावर सर्वसामान्य सर्वसामान्य नागरिकांना आणि महिलांना कसे फसविले जाते हे पुन्हा एकदा उघड झाले आहे.त्यामुळे बुवाबाजी विरुद्ध महाराष्ट्रात कृतीशील कार्यक्रम राबविणार असल्याचे प्रतिपादन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्याचे अध्यक्ष माधव बावगे यांनी केले.तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता हा प्रशिक्षित असला पाहिजे यासाठी प्रशिक्षण शिबीरावर भर देण्यात येईल. तसेच खरात प्रकरणात महाराष्ट्रातील सामाजिक संघटना व महिलांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे असे महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांनी सांगितले.
परळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आज दिनांक 5 रोजी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष माधव बावगे यांना नुकताच बाबा आमटे राष्ट्रीय समाजसेवा पुरस्कार मिळाला.त्याबददल परळी शाखेच्या वतीने त्यांचा व प्रथमच परळी दौऱ्यावर आलेले राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याध्यक्ष माधव बावगे, राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, सुधाकर तट, राज्य सहकार्यवाह (व्यसन प्रबोधन व संघर्ष) महाराष्ट्र अंनिस,सूर्यकांत तेलंग,कार्याध्यक्ष,अंबाजोगाई ,महाराष्ट्र अंनिस,बालाजी राऊत,जिल्हा प्रधान सचिव,धाराशिव,महाराष्ट्र अंनिस आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी माधव बावगे व संजय बनसोडे यांनी उपस्थित अंनिस पदाधिकारी यांना मार्गदर्शन केले.आगामी कार्यक्रमांची माहिती दिली.याप्रसंगी रानब गायकवाड,प्रा. विलास रोडे, सुकेशनी नाईकवाडे, नवनाथ दाने, विकास वाघमारे, अशोक मुंडे, अनंत इंगळे, संजीब राॅय, संजय खाकरे, जी.एस. सौदळे, बालाजी ढगे, विठ्ठलराव झिलमेवाड, भानुदास उफडे,रतन उजगरे, सुरेश जाधव, अभिमन्यू घोबाळे, राहुल सूर्यवंशी, महादेव आजले, भिमराव गोदाम, प्रकाशसिंग तुसाम यांच्या सह अदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा