प्रासंगिक लेख / महात्मा फुले जयंती /11 एप्रिल 2026

इमेज
सामाजिक क्रांतीचे दीपस्तंभ : महात्मा जोतीराव फुले भारताच्या सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महापुरुषाच्या जन्माचा दिवस नाही, तर समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरूवात करणारा दिवस आहे.महात्मा जोतीराव गोविंदराव फुले यांच्या जन्मामुळे भारतीय समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली. सन १८२७ मध्ये जन्मलेल्या या युगपुरुषाच्या विचारांचा प्रकाश आजही समाजाच्या प्रत्येक स्तरावर जाणवतो. ११ एप्रिल पासून महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष साजरे केले जाणार आहे. महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनात द्विशताब्दी जयंती समिती स्थापन केली आहे.समाजातील समता, शिक्षण, स्त्री-सक्षमीकरणांचे विचार लोकांपर्यंत पोहोचविण्याचा राज्य सरकारने संकल्प केला आहे.त्यामुळे ११ एप्रिलचा दिवस भारताच्या सामाजिक समतेच्या तेजस्वी द्विशताब्दी पर्वाचा दिवस म्हणूनही देशात साजरा होत आहे.त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्याचा पुनर्विचार करणे म्हणजे केवळ इतिहासाचे स्मरण नसून वर्तमानाला दिशा देण्याचे कार्य आहे.  मानवतेचा धर्म : समतेचा मूलाधार महात...

सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन

“माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” आज विभागीय कार्यशाळा




छत्रपती संभाजीनगर, 8 (विमाका): “माझं गाव, आरोग्य संपन्न गाव” या उपक्रमांतर्गत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी विभागीय कार्यशाळेचे आयोजन छत्रपती संभाजीनगर येथे आज (९ एप्रिल २०२६) रोजी सकाळी १० ते सायं. ५. या वेळेत करण्यात आले आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते  या कार्यशाळेचे उद्घाटन  होणार आहे.



         मंथन सभागृह, एमआयटी कॉलेज, बीड बायपास रोड, सातारा परिसर येथे होणाऱ्या  या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री तथा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ राहणार आहे. तसेच  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री  मेघना साकोरे- बोर्डीकर , सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  सचिव  रविंद्रन,सार्वजनिक आरोग्य विभागाचे  आयुक्त  डॉ. कादंबरी बलकवडे,  सार्वजनिक विभागाचे आयुक्त (शहरी आरोग्य) डॉ. सुनील भोकरे,  आरोग्य सेवा संचालक डॉ. नितीन अंबाडेकर,   तसेच आरोग्य सेवा संचालक (प्राथमिक)डॉ. विजय कंदेवाड उपस्थित राहणार आहेत.  ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम, सर्वसमावेशक व परिणामकारक करण्याच्या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

   या कार्यशाळेमध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, प्रतिबंधात्मक आरोग्य उपाययोजना, जनजागृती कार्यक्रम तसेच विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच “माझं गांव, आरोग्य संपन्न गाव” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आवश्यक असलेल्या कृती आराखड्यावर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

      या कार्यशाळेत छत्रपती संभाजीनगर, लातूर, नाशिक परिमंडळातून एकूण-१३ जिल्ह्याचा  समावेश असून  संबंधित अधिकारी व कर्मचारी  यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन छत्रपती संभाजीनगर परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक  डॉ.कांचन वानेरे, लातूर परिमंडळ आरोग्य सेवा उपसंचालक डॉ.रेखा गायकवाड तसेच डॉ. कपिल आहेर, याचेमार्फत करण्यात आले आहे.


*****

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!