पर्यावरण, जैविक संवर्धनासाठी भारतभ्रमण: अवलिया दोन युवकांचे परळीत स्वागत
परळी / प्रतिनिधी
विकासाच्या नावाखाली होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास पर्यायी जैविक विविधतेचे नुकसान याची जनजागृती करत पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता टिकविण्यासाठी देशभरात असलेल्या 58 व्याघ्र प्रकल्पला भेट देणाऱ्या युवकांचा परळी येथील नागनाथ निवासी विद्यालयाच्यावतीने सत्कार व सन्मान करण्यात आला.
विकासाच्या नावाखाली आजमितीस मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा ऱ्हास होत चालला आहे.जल, जंगल, जमीन, नदी यांचे अस्तित्व नष्ट होत असल्याने पर्यायी यावर अवलंबून असलेली जैव विविधता नष्ट होत चालली आहे. पर्यावरणातील अन्न साखळी बिघडत जात असल्याने सजीवसृष्टीवर विपरीत परिणाम होत असल्याने परळी येथील आयोध्या नगर मधील रहिवासी असलेला युवक अक्षय मुंडे व त्याचा मित्र नागपूर येथील आशिष यादव यांनी पर्यावरण संवर्धन आणि जैव विविधता जतन आणि संवर्धन उपक्रम हाती देशभरात 58 व्याघ्र प्रकल्पाला पाच महिन्यात टूव्हीलर वर 23 हजार किलोमीटर सफारी माध्यमातून जनजागृती करत आहेत. या अवलिया युवकांनी याचकामासाठी या अगोदर दक्षिण आफ्रिका या देशाचा अभ्यास दौरा पण केला आहे अक्षय मुंडे हा परळी येथील नागनाथ निवासी विद्यालयाचे सहशिक्षक ज्ञानोबा मुंडे यांचा मुलगा असून त्याच्या या सफारी दरम्यान परळी येथे आले असता विद्यालयाच्या वतीने अक्षयची आई मिराबाई मुंडे, व शिक्षक सहकारी मित्र यांचा विद्यालयाच्या वतीने हृदपूर्वक सत्कार व सन्मान करून या कार्याची गिनीस बुकात नोंद व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली वपुढील प्रवासच्य वाटचालीस प्रेरणा देण्यात आली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा