४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार..

इमेज
घरकुल घोटाळा :तत्कालीन मुख्याधिकाऱ्या सह सहा जणांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. निधीचा झाला अपहार केज:- केज नगर पंचायतीच्या तत्कालीन मुख्याधिकारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग न करता नियमबाह्य पद्धतीने ४ कोटी २४ लाख ७३ हजार रु. इतर खात्यावर वर्ग करून शासकीय रक्कमेचा अपहार केला. त्याचा पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने शासकीय दस्तऐवज गहाळ केल्या प्रकरणी मुख्याधिकारी यांच्या तक्रारी वरून तत्कालीन मुख्याधिकाऱ्यासह लेखापाल यांच्यासह सहा जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामुळे केज तालुक्यात खळबळ उडाली आहे. केज नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजनेच्या खात्यामध्ये राज्य शासन व केंद्र शासनाचा प्राप्त निधी हा फक्त पात्र घरकुल लाभार्थ्यांना देणे आवश्यक असताना, दि. २० मे ३०२१ ते ३१ जानेवारी २०२२ या कालावधी मध्ये एकूण रक्कम ४ कोटी २४ लाख ७३ हजार २३ रुपये तत्कालीन मुख्याधिकारी मिलींद सावंत(से. नि.) यांनी लेखापाल आणि इतरांच्या स...

लक्ष्मी मुक्ती योजना....

 स्वतःच्या शेतजमिनीत पत्नीचे नाव 'सहहिस्सेदार' म्हणून लावण्याचे परळी उपविभागीय अधिकाऱ्यांचे आवाहन



परळी वैजनाथ: प्रतिनिधी...

महिलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आणि त्यांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अंतर्गत, परळी तालुक्यातील शेतकरी आता आपल्या मालकीच्या शेतजमिनीत पत्नीचे नाव 'सहहिस्सेदार' म्हणून नोंदवू शकणार आहेत. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन परळीचे उपविभागीय अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाच्या १५ सप्टेंबर १९९२ च्या परिपत्रकानुसार, स्त्रियांचे हक्क सुरक्षित राहावेत यासाठी सामाजिक संघटनांनी केलेल्या सूचनांची दखल घेत हे आदेश देण्यात आले आहेत. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या स्वकष्टार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर स्वतःच्या नावासोबत पत्नीचे नाव सहहिस्सेदार म्हणून नोंदवण्याची इच्छा व्यक्त केली, तर महाराष्ट्र महसूल अधिनियम १९६६ मधील कलमांच्या अधीन राहून ही प्रक्रिया पूर्ण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

अशी करा नोंदणी:

परळी तालुक्यातील ज्या शेतकरी बांधवांना आपल्या पत्नीचे नाव सातबारा उताऱ्यावर लावायचे आहे, त्यांनी संबंधित गावच्या ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) किंवा मंडळ अधिकारी यांच्याकडे रीतसर विनंती अर्ज करावा. अर्जानंतर नियमानुसार फेरफार नोंद घेण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

या निर्णयामुळे ग्रामीण भागातील महिलांना जमिनीमध्ये कायदेशीर वाटा मिळणार असून, त्यांचे आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण होण्यास मोठी मदत होणार आहे. तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपविभागीय अधिकारी, परळी वै. यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....