न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना
न.प. ची अतिक्रमण हटाव मोहिम : कायमस्वरूपी पथकाची स्थापना अतिक्रमणे काढण्यात कोणताही भेदभाव होणार नाही ; सर्व नागरिकांना सारखाच न्याय - मुख्याधिकारी परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी वैजनाथ शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि नागरी सुविधांमधील अडथळे दूर करण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने शहरात सध्या मोठ्या प्रमाणावर ‘अतिक्रमण हटाव मोहीम’ राबवण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे.,अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी कायमस्वरूपी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. अतिक्रमणे काढण्यात भेदभाव होणार नाही. सर्व नागरिकांना सारखाच न्याय दिला जाणार आहे. ही कारवाई पूर्णपणे कायदेशीर व पारदर्शक पद्धतीने केली जाणार असल्याचे मुख्याधिकारी पी. एन. निगळ यांनी अधिकृत निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक जागा आणि प्रामुख्याने नाल्यांवर झालेल्या अतिक्रमणांमुळे वाहतुकीची कोंडी व स्वच्छतेचे प्रश्न निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर, नगर परिषदेने भेदभाव न करता सरसकट कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. विशेष म्हणजे, या मोहिमेत सातत्य राखण्यासाठी प्रशासनाने एक ‘क...