घाटनांदूर रेल्वेथांब्यासाठी प्रस्ताव द्या..
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा रेल्वे व महामार्ग आढावा बैठकीत खा.बजरंग सोनवणे यांच्या अधिकाऱ्यांना निर्देश बीड: मागील दोन वर्षात रेल्वे कामाला गती दिलेली आहे. आता रेल्वेचे काम युध्द पातळीवर करून १५ ऑगस्ट २०२६ पर्यंत पुणे ते परळी रेल्वे धावलीच पाहिजे, शिवाय बीड जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गासहित ग्रामीण मार्गावरील ब्लॅकस्पॉट कमी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे निर्देश खा.बजरंग सोनवणे यांनी रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीत वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन विभागाच्या हॉलमध्ये रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग आढावा बैठकीचे आयोजन केले होते. बैठकीत विविध प्रलंबित कामे, भूसंपादन, निकृष्ट दर्जा, अपघातप्रवण ठिकाणे व नागरिकांच्या अडचणी यांसह सर्वच मुद्द्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन, रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी उपस्थित होते. खा.बजरंग सोनवणे यांनी बैठकीत अंबाजोगाई, केज, नेकनूर, मांजरसुंबा, पाटोदा व माजलगाव शहरांभोवती बायपास व उड्डाणपूल उभारण्याचा मुद्दा उपस्...