पोस्ट्स

इमेज
परळी सकल मातंग समाजाच्या वतीने अ.ब.क.ड आरक्षण उपवर्गीकरणासाठी तहसिल कार्यलय समोर धरणे आंदोलन व निदर्शने  परळी/ प्रतिनिधी  सुप्रीम कोर्टाने १ ऑगस्ट २०२४ रोजी दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जाती प्रवर्गाचे अ ब क ड उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी परळी तहसील कार्यालयावर सकल मातंग समाजाच्या वतीने दिनांक ३ जून २०२६ रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात आली.   दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी दविंदर सिंग पंजाब सरकार या खटल्यात सुप्रीम कोर्टाच्या सात बेंचच्या पीठाने ६:१ असा निर्णय देऊन अनुसूचित जातींच्या आरक्षण उपवर्गीकरणास मान्यता देण्यात आली असून. हरियाणा, हिमाचल प्रदेश ,कर्नाटक, पंजाब , तेलंगणा सह पाच राज्यांनी उप वर्गीकरणाचा निर्णय घेतला आहे .महाराष्ट्रात 14 ऑक्टोबर 2025 रोजी यासंदर्भात न्यायमूर्ती बद्दर यांची समिती नेमली असून समितीने शासनाला अहवाल सादर केला आहे. तरीही अद्याप उपवर्गीकरणाचा निर्णय होत नसल्याने परळी तालुक्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने आज दिनांक 3 जून 2026 रोजी तहसील कार्यालयावर मोठ्या संख्येने समाज बांधवांच्या उपस्थितीत धरणे आंदोलन व निदर्शने करण्यात...

अज्ञात चार चाकी वाला फरार ....

इमेज
बायपासवर भीषण अपघात; वृद्ध गंभीर जखमी गेवराई, प्रतिनिधी... गेवराई बायपासवर आज दुपारी झालेल्या भीषण अपघातात एक वृद्ध गंभीर जखमी झाले. भरधाव चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने अब्बास युसूफ पठाण (वय ६७, रा. राजापूर, ता. गेवराई) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना उपचारासाठी गेवराई येथील रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी बीड जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात रेफर केले असल्याची माहित आहे

विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा

इमेज
  शेतकरी कर्जमाफीला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता, 2 लाखांपर्यंतचे कर्ज होणार माफ! विधान परिषद निवडणुकीनंतर होणार घोषणा मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजने'ला अधिकृत मंजुरी देण्यात आली. विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा दिला आहे. या योजनेअंतर्गत ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीककर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ केले जाणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंतचे प्रोत्साहनपर अनुदानही दिले जाईल. या महत्त्वपूर्ण निर्णयाचा राज्यातील सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना थेट फायदा होणार आहे. मात्र, यामुळे सरकारी तिजोरीवर तब्बल २५ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. लाडकी बहीण योजना आणि आता ही कर्जमाफी यामुळे आगामी काळात सरकारला मोठी आर्थिक काटकसर करावी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या कर्जमाफीची अधिकृत घोषणा सध्या सुरू असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर...
इमेज
  परळीत अतिक्रमण न हटवल्यास नगर परिषदेसमोर साखळी उपोषण; प्रशासनाला निवेदन परळी वैजनाथ (प्रतिनिधी):शहरातील ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी रस्ता आणि गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या भागातील रस्ते व नाल्यांच्या कडेला झालेले अवैध अतिक्रमण प्रशासनाने तत्काळ हटवावे, अन्यथा नगर परिषदेसमोर गांधीगिरी पद्धतीने साखळी उपोषण करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते दीपक जोशी यांनी दिला आहे. या संदर्भातील मागण्यांचे एक रीतसर निवेदन आज नगर परिषद प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले.शहरातील या प्रमुख रस्ते आणि मुख्य नाल्यांवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना आणि वाहनधारकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण पोलीस स्टेशन ते बसवेश्वर कॉलनी दरम्यानच्या नाली व रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत असून सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी परिसरात अस्वच्छता पसरली आहे.तसेच गायकवाड यांचे घर ते महात्मा बसवेश्वर चौक या अत्यंत वर्दळीच्या परिसरातील नाला व रस्त्याच्या कडेला असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघातांचा धोका कमालीचा वाढला आ...
इमेज
  धनंजय देशमुख व खिंडकर यांच्यातील कथित पिस्तूल प्रकरणातील दोन्ही तक्रारी खोट्या; बीड पोलिसांचा तपास पूर्ण, होणार कायदेशीर कारवाई ​बीड: पोलीस यंत्रणेची दिशाभूल करून कायद्याचा सर्रास गैरवापर करणाऱ्यांविरोधात बीड ग्रामीण पोलिसांनी आता कडक पाऊल उचलले आहे. बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत ३० मे २०२६ रोजी रात्री घडलेल्या कथित पिस्तूल दाखवून जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, दोन्ही बाजूने दाखल करण्यात आलेल्या परस्परविरोधी तक्रारी पूर्णपणे खोट्या असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी कायद्याचा गैरवापर केल्यामुळे त्यांच्याविरोधात न्यायालयाच्या माध्यमातून कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती बीड पोलीस प्रशासनाने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.   ​या प्रकरणाची सविस्तर पार्श्वभूमी अशी की, मस्साजोग (ता. केज) येथील रहिवासी धनंजय पंडितराव देशमुख यांनी समाधान खिंडकर व इतर तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि शस्त्र अधिनियमान्वये पहिली तक्रार दाखल केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून बेलवाडी येथील रहिवासी समाधान बाबु...

अहिल्यादेवींचे संस्कार अन् आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी

इमेज
ना. पंकजाताई मुंडे यांनी केले पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन मुंबई दि. ३१ -- राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी आज रामटेक निवासस्थानी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांना त्यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त अभिवादन केले. माझ्या राजकीय जीवनात अहिल्याबाईंचे योगदान महत्वाचे असून त्यांचे संस्कार व आदर्श माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत असं त्यांनी म्हटलं आहे.     पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त आज रामटेक निवासस्थानी ना. पंकजाताई मुंडे यांनी त्यांच्या मूर्तीस पुष्प वाहून त्यांना अभिवादन केले. अभिवादनाचा एक व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. धर्मकार्य, संस्कृतीसंरक्षण, निकोप राजसत्ता आणि शौर्य गाजवणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या प्रत्येकासाठी प्रेरणास्थान आहेत .आपल्या राजकीय वाटचालीतही त्यांचाच आदर्श घेऊन आपण पुढे जात आहोत असे त्यांनी म्हटले आहे. ••••

शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये

इमेज
किमान १० जून पर्यंत राज्यातील बहुतांश भागात मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही १ जून पासून वादळी पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये  मुंबई, दि ३१ मे: सध्या राज्यातील हवामानात बदल होण्यास सुरुवात झाली आहे, आणि १ जून पासून सुरु होणाऱ्या आठवड्यात हवामानात अजून बदल होईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपार नंतरचे ढग आणि काही प्रमाणात वादळी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. कोकणात देखील काही प्रमाणात पावसाचा अंदाज आहे. याच बरोबर मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होईल, मात्र विदर्भातील काही भागांमध्ये, प्रामुख्याने पूर्व विदर्भ, कमाल तापमान ४० अंशाच्या वर कायम राहील. आगामी वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळात पोहोचलेला नाही. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.  कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागांकडून शेतकऱ्यांना आणि लोकांना आवाहन करण्यात येत आहे की, संभाव्य हवामान बदल लक्षात घेऊन योग्य ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी: • शे...
इमेज
अंगरक्षकाचे पिस्टल काढून जीवे मारण्याचा प्रयत्न; दिवंगत सरपंच संतोष देशमुखांचे बंधू धनंजय यांच्यावर बीडमध्ये गुन्हा दाखल केज: मस्साजोग येथील गाजलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आता एक नवीन आणि धक्कादायक वळण मिळाले आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी आपल्या शासकीय अंगरक्षकाचे अधिकृत पिस्टल काढून एका व्यक्तीच्या डोक्याला लावत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना बीडमध्ये घडली आहे. या प्रकरणी समाधान खिंडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात धनंजय देशमुख यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच या प्रकरणात एका साक्षीदाराला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला असतानाच आता थेट पीडित कुटुंबातील मुख्य सदस्यावरच गंभीर गुन्हा नोंदवल्याने जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समाधान खिंडकर यांनी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत नमूद केल्यानुसार, आरोपी धनंजय देशमुख यांनी अचानक त्यांच्या शासकीय अंगरक्षकाची पिस्टल काढून घेतली आणि ती थ...

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

MB NEWS:अंबाजोगाई परळी रस्त्यावर भिषण आपघात:परळीतील तीन युवक गंभीर

MB NEWS- *करुणा शर्माच्या गाडीत आढळले पिस्तुल; परळीत खळबळ* *हजारो महिलांची करुणा शर्मांना अटक करण्याची मागणी; धनंजय मुंडे व कुटुंबाचा घातपात करण्याचा डाव असल्याचा संशय*

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या