मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

आता पुन्हा एका बांधकाम कामगाराला जनतेने बनवले नगरसेवक !

बांधकाम कामगारांना 'राजकीय बरकत' देणारे बरकतनगर: मिस्त्री काम करणाऱ्यांनाच इथे मिळते संधी !

मिस्त्री काम करणारे आयुब पठाण नेता बनले :आता पुन्हा एका बांधकाम कामगाराला जनतेने बनवले नगरसेवक !

परळी वैजनाथ, एमबी न्यूज वृत्तसेवा....

       लोकशाहीमध्ये जनता ही सर्वोपरी असते याचे अत्यंत  अधोरेखित करणारे चित्र परळीत बघायला मिळाले. नगर परिषदेची निवडणूक ही स्थानिक नेते बनवणारी निवडणूक असते. या निवडणुकीतूनच त्या- त्या भागातून पुढचे नेते तयार होत असतात. परळी शहरातील बरकतनगर हा सामन्यांतून  राजकीय नेतृत्व उदयाला आणणारा भाग ठरला आहे. विशेष म्हणजे बांधकाम कामगारांना 'राजकीय बरकत' देणारे बरकतनगर अशी आता या भागाची ओळख होऊ लागली आहे. परळीचे उपनगराध्यक्ष राहिलेले, दोन वेळा नगरसेवकपदी विराजमान राहिलेले विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आयुब खान पठाण यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात नगरपालिका निवडणुकीपासून केली. तत्पूर्वी ते सुद्धा एक बांधकाम कामगार 'मिस्त्री' म्हणून काम करणारे होते. या निवडणुकीतही पुन्हा एकदा एका बांधकाम कामगारालाच नगरसेवक बनण्याची संधी या भागातील मतदारांनी दिली आहे.

         परळी वैजनाथ नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक तीन अ मधून काँग्रेसचे उमेदवार फारूक गणी सय्यद उर्फ बब्बू यांनी इतिहास रचला आहे. काँग्रेसने परळीच्या निवडणुकीत सोळा उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र त्यापैकी केवळ बब्बू हेच विजयी झाले. विशेष म्हणजे केवळ 33 वर्ष वयाचे फारूक गणी सय्यद हे अतिशय सामान्य कार्यकर्ते व  बांधकाम कामगार म्हणून फरशीची मिस्त्री कामे करणारे एक कामगार आहेत. फारुख गणी सय्यद उर्फ बब्बू यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा ठरला आहे.व्यवसायाने मिस्त्री च्या हाताखाली काम करणारा बांधकाम कामगार असणारा हा युवक निवडणुकीच्या रिंगणात उतरला. प्रतिस्पर्ध्यांकडे गाड्या, घोड्या पैशांचे प्रचंड बळ व अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक असतानाही त्यांनी घराघरात जाऊन सर्वसामान्य माणसाचे मन जिंकले.त्यांच्या माध्यमातून  एक बांधकाम कामगार नगरसेवक झाला. काँग्रेसने उमेदवारी देताना सुरुवातीला या जागेवर काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता मात्र काँग्रेस शहराध्यक्ष सय्यद हनीफ उर्फ बहादुरभाई यांनी बब्बू सारख्या साध्या युवकावर विश्वास दाखवला आणि त्यांना निवडणुकीत उतरवले. बब्बू यांना १२१६ मते मिळाली तर महायुतीच्या उमेदवाराला 1144 मतावर समाधान मानावे लागले. केवळ 72 मतांच्या फरकाने बब्बू यांचा विजय झाला. त्यामुळे बरकत नगर भागातून पुन्हा एकदा एक बांधकाम कामगार नगरसेवक बनला आहे.

राजकीय कारकिर्दीपुर्वी माजी उपनगराध्यक्ष आयुब पठाणही होते मिस्त्री...

     प्रभाग क्रमांक तीन या प्रभागात मोठा भाग हा बरकतनगरचा येतो. त्यामुळे या प्रभागाची ओळख बरकतनगर वार्ड अशीच आहे. या प्रभागातून स्थानिक निवडणुकांमध्ये कामगार वर्गाला विशेषतः बांधकाम कामगारांना जनता राजकीय पाठबळ देत 'बरकत' मिळवून देते अशा प्रकारची एक अघोषित परंपरा व ओळख निर्माण झाली आहे. यापूर्वी या प्रभागाचे प्रतिनिधित्व करणारे आयुब खान पठाण हे या भागातून दोन वेळा नगरपरिषदेवर नगरसेवक म्हणून निवडून गेलेले आहेत. त्याचबरोबर परळी नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पदावर आयुब पठाण यांनी काम केलेले आहे. वेगवेगळे सभापती पद व उपनगराध्यक्ष पद यावर काम करणारे आयुब पठाण हे सर्वसामान्य, शांत, संयमी नेते म्हणून परळी शहरात आज ओळखले जातात. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून त्यांना नव्याने जबाबदारी देण्यात आलेली आहे. मात्र आज एका प्रमुख पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून परळी शहराचा नेता बनलेल्या आयुब खान पठाण यांची राजकीय कारकीर्द सुरू होण्यापूर्वी ते सुद्धा एक बांधकाम कामगार मिस्त्री म्हणून परिचित होते. त्यावेळीही या प्रभागातील जनतेने आपला आशीर्वाद बांधकाम कामगाराच्या मागे उभा करत आयुब भाई पठाण यांना दोन वेळा निवडून दिलेले आहे. याचीच पुनरावृत्ती यावर्षीच्या निवडणुकीत झाल्याचे बघायला मिळत आहे. फारूक गणी सय्यद उर्फ बब्बू या तरुण बांधकाम कामगाराला नगरसेवक बनवत या प्रभागाने पुन्हा एकदा बांधकाम कामगारालाच राजकीय दृष्ट्या 'बरकत' दिल्याचे दिसून येत आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....