मुख्याधिकारी यांना लिहिले सविस्तर उत्तर......

इमेज
  सरस्वती नदी वाचवा; काँक्रीटीकरण नव्हे तर पुनर्जीवन करा — अश्विन मोगरकर यांचे परळी नगरपरिषदेला निवेदन परळी वैजनाथ : प्रतिनिधी  धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यावरणीय दृष्ट्या महत्त्व असलेल्या सरस्वती नदीच्या काँक्रीटीकरण प्रकल्पाविरोधात सामाजिक कार्यकर्ते अश्विन मोगरकर यांनी परळी वैजनाथ नगरपरिषदेला सविस्तर निवेदन देत हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. नगरपरिषदेकडून दि. 30 एप्रिल 2026 रोजी देण्यात आलेल्या पत्राला उत्तर देताना मोगरकर यांनी म्हटले आहे की, सरस्वती नदी ही नैसर्गिक नदी असल्याचे तसेच ती पूर्वी बाराही महिने वाहत असल्याचे नगरपरिषदेकडून प्रथमच अधिकृतरीत्या मान्य करण्यात आले आहे. भूमी अभिलेख कार्यालयाकडे नदीची नैसर्गिक हद्द कायम करण्यासाठी मोजणीची मागणीही करण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. निवेदनात नगरपरिषदेवर गंभीर आरोप करण्यात आले असून, नदीत थेट सांडपाणी व गटाराचे पाणी सोडले जात असल्यामुळे जलप्रदूषण प्रतिबंधक कायद्यांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच नदीपात्रातील अतिक्रमण रोखण्यात नगरपरिषद अपयशी ठरल्याचे सांगत, सरस्वती नदीपात्रात उभारण्यात आल...

 श्रीपतरायवाडी येथे गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना



अंबाजोगाई.....दि.18जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातर्फे श्रीपतरायवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना वाण म्हणून गावरान वाणाचे बीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंचक मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हल्ली गावरान भाज्या व‌ फळे दुर्लभ होत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने गावरान भाजी व फळे महत्त्वाची आहेत.म्हणुन महिला महाविद्यालयांतील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातील विद्यार्थीनींनी श्रीपतरायवाडी या गावात देशी गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना करून हे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरावे या संबंधी जागृती करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मंचक मोरे यांनी गावरान बियाणे बॅंकेची स्थापना करण्याचा उद्देश सांगुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेजबीन फारुकी यांनी शेतकऱ्यांचे स्वागत‌ करुन गावरान वाणाचे बियाणे आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुमनताई पवार या होत्या.तसेच श्री.राजेंद्र जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सौ.श्रीकन्या जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थींनींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....