संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार

इमेज
  संसदेत कांदा उत्पादकांसाठी एल्गार खासदार बजरंग सोनवणे यांचे आंदोलन; हमीभाव, निर्यातमुक्ती व सीबीआय चौकशीची मागणी नवी दिल्ली : देशातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर संसद भवन परिसरात आज जोरदार आंदोलन करण्यात आले. खासदार बजरंग सोनवणे यांनी हे आंदोलन करत केंद्र सरकारचे लक्ष वेधले. कांद्याच्या दरातील सततची घसरण आणि निर्यातीवरील निर्बंधांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रासह देशभरातील बाजारपेठेत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही परत मिळत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे सोनवणे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्र सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या मांडल्या. कांद्याला कायदेशीर हमीभाव लागू करावा, निर्यातीवरील सर्व निर्बंध हटवून कांदा निर्यात पूर्णपणे मुक्त करावी आणि साठेबाजी तसेच धोरणात्मक अनियमिततेबाबत Central Bureau of Investigation (केंद्रीय अन्वेषण विभाग) मार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. “शेतकऱ्यांच्या कष्टाला योग्य मोबदला मिळत नाही...

 श्रीपतरायवाडी येथे गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना



अंबाजोगाई.....दि.18जानेवारी रोजी अंबाजोगाई येथील कला व वाणिज्य महिला महाविद्यालयातील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातर्फे श्रीपतरायवाडी येथे हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमात महिला शेतकऱ्यांना वाण म्हणून गावरान वाणाचे बीज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मंचक मोरे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. हल्ली गावरान भाज्या व‌ फळे दुर्लभ होत आहेत.आरोग्याच्या दृष्टीने गावरान भाजी व फळे महत्त्वाची आहेत.म्हणुन महिला महाविद्यालयांतील आजीवन शिक्षण व विस्तार सेवा विभागातील विद्यार्थीनींनी श्रीपतरायवाडी या गावात देशी गावरान वाणाच्या बियाणे बॅंकेची स्थापना करून हे बियाणे शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये वापरावे या संबंधी जागृती करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मंचक मोरे यांनी गावरान बियाणे बॅंकेची स्थापना करण्याचा उद्देश सांगुन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम अधिकारी प्रा.महेजबीन फारुकी यांनी शेतकऱ्यांचे स्वागत‌ करुन गावरान वाणाचे बियाणे आरोग्यासाठी कसे महत्त्वाचे आहे यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.सुमनताई पवार या होत्या.तसेच श्री.राजेंद्र जाधव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.सौ.श्रीकन्या जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.या प्रसंगी बहुसंख्य शेतकरी व विद्यार्थींनींची उपस्थिती होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

Accident.....

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!