महा युएलबी पोर्टलवर ऑनलाईन सुविधा उपलब्ध....
वादळी वाऱ्यात दुर्दैवी घटना; लिंबाचे झाड कोसळून महिलेचा मृत्यू
माजलगाव (प्रतिनिधी)तालुक्यातील मोगरा येथे शुक्रवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतातील लिंबाचे झाड कोसळून सुमनबाई हरिभाऊ घनघाव या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मोगरा येथे शुक्रवारी जोरदार वादळी वाऱ्यामुळे एक दुर्दैवी अपघात घडला. शेतात असताना लिंबाचे झाड अचानक कोसळले आणि त्याचा फाटा सुमनबाई हरिभाऊ घनघाव यांच्या पोटात घुसला. या गंभीर जखमेमुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्यांना माजलगाव व संभाजीनगर येथे उपचारासाठी हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. सुमनबाई या शेळ्या राखण्याचे काम करत होत्या तसेच त्या घनघाव कुटुंबातील कुटुंबप्रमुख होत्या. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवले असून मोगरा गावात शोककळा पसरली आहे. दरम्यान, या अपघाती मृत्यूची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन संबंधित कुटुंबास तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मागासवर्गीय समाजाच्या वतीने तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा