१९ बटुंचा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा

इमेज
  परळीत ब्राह्मण सभेच्या वतीने आज ४६ वा सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा विशेष गौरव: नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील नवनिर्वाचित प्रतिनिधींचा होणार सत्कार परळी वैजनाथ (प्रतिनिधी):         येथील ब्राह्मण बहुद्देशीय सभेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ४६ व्या सामुदायिक उपनयन संस्कार (मुंज) सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आज बुधवार, दिनांक २२ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८:५२ च्या शुभ मुहूर्तावर प्रभू वैद्यनाथ मंदिर परिसरातील दर्शन मंडप येथे हा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यात परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई धर्माधिकारी व समाजातील लोकप्रतिनिधींचा, नवनिर्वाचित प्रतिनिधींचा सत्कार सकल ब्राह्मण समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे.        गेल्या ४५ वर्षांची प्रदीर्घ आणि उज्ज्वल परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्रात विशेष मान्यता आहे. अत्यंत शिस्तबद्ध नियोजन आणि मांगल्याच्या वातावरणात होणारा हा उपक्रम परळी नगरीचे भूषण मानला जातो. यावर्षीच्या सोहळ्यासाठी नोंदणी पूर्ण झाली असून एकूण २१ मुंज...

सर्वांना सारखा न्याय देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी

व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन सर्वांना सारखा न्याय देऊन अतिक्रमण हटाव मोहीम राबवावी



परळीत अतिक्रमण हटाव मोहिमेत पक्षपातीपणा नको; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांची मागणी

परळी वैजनाथ (प्रतिनिधी):

  परळी नगर परिषदेच्या वतीने शहरात सध्या राबवण्यात येत असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत  पक्षपातीपणा करू नये. रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणांमुळे भाविक आणि नागरिकांना वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे हे अतिक्रमण कोणत्याही भेदाभेदाशिवाय सरसकट काढण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केलीआहे. व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन, सर्वांना सारखा न्याय देऊन ही मोहीम राबवावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे.

     राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष  दीपक देशमुख यांनी आज मोंढा परिसरात जाऊन स्थानिक व्यापाऱ्यांची भेट घेतली आणि नगर परिषदेच्या मोहिमेची पाहणी केली. यावेळी व्यापाऱ्यांनी त्यांच्याकडे आपल्या अडचणी मांडल्या. या भेटीनंतर  बोलताना देशमुख म्हणाले की, परळी हे ज्योतिर्लिंग वैजनाथाचे पावन क्षेत्र असल्याने येथे देशभरातून भाविक येतात. मात्र, मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणामुळे या भाविकांना आणि स्थानिकांना तासनतास वाहतूक कोंडीत अडकून पडावे लागते. नगर परिषदेने ही मोहीम राबवताना कुणाचे हित न पाहता रस्ते मोकळे करावेत. मात्र रस्त्यावरील आणि फूटपाथवरील अतिक्रमण काढताना गरिबांवर अन्याय होऊ नये, अशी भूमिकाही त्यांनी मांडली. मोठ्यांचे अतिक्रमण काढताना नगर परिषद नरमाईची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

       प्रशासनाने आधी पार्किंगची योग्य व्यवस्था करावी आणि फूटपाथवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण काढण्यापूर्वी त्यांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावे असेही देशमुख यांनी स्पष्ट केले. तसेच अतिक्रमण सीमा निश्चित करून खुणा कराव्यात. तोंड बघून अतिक्रमण न काढता व्यापारी व नागरिकांना विश्वासात घेऊन ही मोहीम राबवावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांनी केली आहे. याबाबत दीपक देशमुख यांनी नगरसेवक नितीन बागवाले, व्यंकटेश शिंदे, शिवसेना शहराध्यक्ष वैजनाथ माने, वैजनाथ जोशी, गोविंद माने आदींसह न. प. उपमुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....