प्रदीप खाडे सहसचिव, नाथ शिक्षण संस्था, परळी वैजनाथ यांचा विशेष लेख...
शिक्षण, राजकारण आणि समाजकारणाचा समतोल साधणारे लोकनेते : शिक्षणप्रेमी आ.धनंजय मुंडे समाजाचा सर्वांगीण विकास घडवायचा असेल तर शिक्षण हीच सर्वात मोठी शक्ती आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला "शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे" हा संदेश कृतीत उतरविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या नेतृत्वामध्ये आ.धनंजय मुंडे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. राजकारणात सक्रिय भूमिका बजावत असतानाच शिक्षण, सामाजिक न्याय, कला, क्रीडा आणि ग्रामीण विकास या सर्व क्षेत्रांत त्यांनी भरीव योगदान दिले आहे. विद्यार्थी हा देशाच्या भविष्याचा शिल्पकार आहे, या विचारातून त्यांनी शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री म्हणून काम करताना उसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी संत भगवानबाबा वसतिगृह उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला. नाथ प्रतिष्ठान आणि नाथ शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्ष...