इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार -माधव मुंडे

 गावच्या विकासाला खीळ : मनमानी कारभाराला कंटाळून हाळमच्या उपसरपंचाचा राजीनामा




सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार  -माधव मुंडे

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी):     

        लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या अनियमिततेवर संताप व्यक्त करत, परळी तालुक्यातील हाळमच्या उपसरपंचाने थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवनाथ सुखदेव दहिफळे असे या उपसरपंचाचे नाव असून, त्यांनी आपला राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.     


     परळी तालुक्यातील हाळमचे उपसरपंच देवनाथ सुखदेव दहिफळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रामसभाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय नसणे, मासिक बैठकांचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महसुली कामांतही मोठा गोंधळ असल्याचा आरोप दहिफळे यांनी केला आहे. गावठाण जमिनीवर चुकीची अतिक्रमणे होणे, पीटीआर रजिस्टरमध्ये चुकीच्या नोंदी करणे आणि ग्रामसेवकांनी वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब न देणे अशा गंभीर बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. 

      "सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे मी पदावर राहण्यास इच्छुक नाही," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्याच्या प्रती जिल्हाधिकारी (बीड), उपजिल्हाधिकारी (अंबाजोगाई) आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी गावातील जेष्ठ नेतेसर्वश्री अंगदराव दहीफळे , माजी सरपंच पांडुरंग दहिफळे, अरुण दहिफळे माजी चेअरमन,सिद्धेश्वर मधुकर गुट्टे,रवींद्र मुंडे,नाथराव गुट्टे, जनार्धन दहिफळे,मंचक गुट्टे, लिंबाजी दहिफळे, मधुकर दहिफळे, हरिश्चंद्र महाराज गुट्टे,पंढरी गित्ते, पंडित दहिफळे,ज्ञानोबा पेंटूळे,, धनराज मुंडे आदीजन उपस्थित होते

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार- माधव मुंडे

 या राजीनामा च्या वेळी युवा नेते माधव मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगितले की सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा उन्माद वाढला आहे.गावातील लोकांवर अन्यायाची परिसीमा गाठली आहे. या सत्ताधाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिक वैतागून गेला असून गावाला यांच्या जाचातून मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.अशी प्रतिक्रिया युवा नेते माधव मुंडे यांनी यावेळी दिली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....