इमेज
  परळीत ६७ व्या महाराष्ट्र दिनाचा मुख्य शासकीय सोहळा; आमदार धनंजय मुंडे यांच्या हस्ते होणार ध्वजवंदन परळी (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त परळी शहरात मुख्य शासकीय ध्वजवंदनाचा समारंभ मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शुक्रवार, दिनांक १ मे २०२६ रोजी सकाळी ठीक ८:०० वाजता परळी येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय प्रांगणात संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे परळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. धनंजय पंडितराव मुंडे यांच्या शुभहस्ते ध्वजवंदन करण्यात येणार आहे. महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या शासकीय सोहळ्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. परळीचे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री. अरविंद लाटकर यांनी या समारंभाचे आयोजन केले असून, त्यांनी परळी शहर व तालुक्यातील सर्व सन्माननीय नागरिक, लोकप्रतिनिधी आणि पत्रकार बांधवांना या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या गौरवशाली परंपरेला आणि हुतात्म्यांच्य...

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार -माधव मुंडे

 गावच्या विकासाला खीळ : मनमानी कारभाराला कंटाळून हाळमच्या उपसरपंचाचा राजीनामा




सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार  -माधव मुंडे

 परळी वैजनाथ (प्रतिनिधी):     

        लोकप्रतिनिधी म्हणून निवडून येताना गावकऱ्यांना दिलेली आश्वासने पूर्ण होत नसल्याने आणि ग्रामपंचायतीच्या कारभारात होत असलेल्या अनियमिततेवर संताप व्यक्त करत, परळी तालुक्यातील हाळमच्या उपसरपंचाने थेट आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवनाथ सुखदेव दहिफळे असे या उपसरपंचाचे नाव असून, त्यांनी आपला राजीनामा गट विकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे.     


     परळी तालुक्यातील हाळमचे उपसरपंच देवनाथ सुखदेव दहिफळे यांनी आपल्या राजीनामा पत्रात ग्रामपंचायत प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून गावात ग्रामसभाच झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय नसणे, मासिक बैठकांचा अभाव, पथदिव्यांची दुरवस्था आणि स्वच्छतेचा प्रश्न यांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ मूलभूत सुविधाच नव्हे, तर महसुली कामांतही मोठा गोंधळ असल्याचा आरोप दहिफळे यांनी केला आहे. गावठाण जमिनीवर चुकीची अतिक्रमणे होणे, पीटीआर रजिस्टरमध्ये चुकीच्या नोंदी करणे आणि ग्रामसेवकांनी वित्त आयोगाच्या निधीचा हिशोब न देणे अशा गंभीर बाबी त्यांनी उघड केल्या आहेत. 

      "सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मनमानी कारभारामुळे मी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करू शकलो नाही, त्यामुळे मी पदावर राहण्यास इच्छुक नाही," असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. या राजीनाम्याच्या प्रती जिल्हाधिकारी (बीड), उपजिल्हाधिकारी (अंबाजोगाई) आणि तहसीलदार यांनाही पाठवण्यात आल्या आहेत. यावेळी गावातील जेष्ठ नेतेसर्वश्री अंगदराव दहीफळे , माजी सरपंच पांडुरंग दहिफळे, अरुण दहिफळे माजी चेअरमन,सिद्धेश्वर मधुकर गुट्टे,रवींद्र मुंडे,नाथराव गुट्टे, जनार्धन दहिफळे,मंचक गुट्टे, लिंबाजी दहिफळे, मधुकर दहिफळे, हरिश्चंद्र महाराज गुट्टे,पंढरी गित्ते, पंडित दहिफळे,ज्ञानोबा पेंटूळे,, धनराज मुंडे आदीजन उपस्थित होते

सत्ताधाऱ्यांच्या जाचातून गावाला मुक्त करणार- माधव मुंडे

 या राजीनामा च्या वेळी युवा नेते माधव मुंडे यांनी प्रतिक्रिया देताना असे सांगितले की सत्ताधाऱ्यांचा सत्तेचा उन्माद वाढला आहे.गावातील लोकांवर अन्यायाची परिसीमा गाठली आहे. या सत्ताधाऱ्यांना गावातील प्रत्येक नागरिक वैतागून गेला असून गावाला यांच्या जाचातून मुक्त केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.अशी प्रतिक्रिया युवा नेते माधव मुंडे यांनी यावेळी दिली.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....