आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष.....

इमेज
तांत्रिक बिघाडामुळे महाऑनलाईन आयडीद्वारे मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद मुंबई: राज्यभरातील नागरिकांना विविध शासकीय दाखले आणि सेवा पुरवणाऱ्या 'आपले सरकार सेवा केंद्रां'मधील (CSC) कामकाज सध्या तांत्रिक अडचणींमुळे ठप्प झाले आहे. महाऑनलाईन आयडीद्वारे (MahaOnline ID) मिळणाऱ्या सर्व सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 'आपले सरकार' पोर्टलशी संबंधित महाऑनलाईन प्रणालीमध्ये काही गंभीर तांत्रिक दोष निर्माण झाले आहेत. यामुळे उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या कागदपत्रांसाठी येणारे अर्ज स्वीकारणे आणि त्यावर प्रक्रिया करणे कठीण झाले आहे. सध्या अनेक शैक्षणिक प्रवेश प्रक्रिया आणि सरकारी योजनांचे अर्ज भरण्याचे काम सुरू असल्याने, या तांत्रिक बिघाडाचा मोठा फटका विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे. या संदर्भात प्रशासनाकडून एक महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. तांत्रिक अडचण सोडवण्यासाठी तांत्रिक पथक (Technical Team) युद्धपातळीवर काम करत असून लवकरच ...

दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...

ग्रामपंचायत पोटनिवडणूक: परळीतील अशी एक ग्रामपंचायत जिथे  दोन जागा… दोनदा निवडणूक… तरीही एकही अर्ज नाही!

परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....

     परळी वैजनाथ तालुक्यातील नागदरा-आनंदवाडी ग्रामपंचायतीची एक विलक्षण आणि विचार करायला लावणारी परिस्थिती समोर आली आहे.ग्रामपंचायतीतील दोन सदस्य पदांच्या जागांसाठी दोनदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊनही एकही अर्ज न आल्याने या जागा पुन्हा रिक्तच राहिल्या आहेत. विशेष म्हणजे, ही घटना एकदाच घडलेली नसून 2023 मधील सार्वत्रिक निवडणुकीतही याच दोन जागांसाठी एकही उमेदवार पुढे आला नव्हता. त्यानंतर अलीकडे झालेल्या पोटनिवडणुकीतही हीच परिस्थिती कायम राहिली.

     या मागील कारण शोधले असता एक ठोस आणि संघटित भूमिका समोर आली आहे. नागदरा व आनंदवाडी या दोन गावांची मिळून ही  ग्रुप ग्रामपंचायत असून, एकूण 9 सदस्य पदांपैकी 5 जागा नागदरा तर 3 जागा आनंदवाडीच्या मतदारांवर आधारित आहेत. रिक्त राहिलेल्या दोन जागा या आनंदवाडीच्या वाट्याला येणाऱ्या असल्याने, त्या गावातील नागरिकांनी निवडणूक प्रक्रियेवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आनंदवाडी ग्रामस्थांची अनेक वर्षांपासून स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापन करण्याची मागणी आहे. मात्र, प्रशासनाकडून या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातो.याच पार्श्वभूमीवर, जोपर्यंत स्वतंत्र ग्रामपंचायत मिळत नाही, तोपर्यंत निवडणूक लढवणार नाही, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतलेली आहे.

दोन निवडणुका…पण परिस्थिती जैसे थे...

           2023 सार्वत्रिक निवडणूक – 2 जागा रिक्त राहिल्या.आत्ता झालेल्या पोटनिवडणूकीत – पुन्हा 2 जागा रिक्त यामुळे या जागा वर्षानुवर्षे रिक्तच राहण्याची अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे. एकीकडे संपूर्ण तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकांचा उत्साह, चुरस आणि राजकीय रस्सीखेच पाहायला मिळत असताना, दुसरीकडे नागदरा- आनंदवाडी येथे निवडणूक प्रक्रिये बाबतची अनास्था आणि आंदोलनात्मक भूमिका स्पष्टपणे दिसून येते. आता प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आनंदवाडी ग्रामस्थांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घेणे गरजेचे ठरत आहे. अन्यथा, ही रिक्त जागांची परंपरा पुढील निवडणुकां मध्येही कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....