इमेज
  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ - डॉ. भरत मुंडे टोकवाडीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी परळी वैजनाथ, प्रतिनिधी...      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेली राज्यघटना हा आपल्या प्रगतीचा आधारस्तंभ आहे. आपण सर्वांनी बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संकल्प करूया असे आवाहन डॉ. भरत मुंडे यांनी केले.        भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानचा सामाजिक उपक्रमाने साजरी करण्यात आली. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती टोकवाडी येथे मोठ्या उत्साहात  साजरी करण्यात आली.यावेळी गावात मिरवणुक दरम्यान उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन जय हिंद सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने मोफत  पाण्याच्या बॉटल चे वाटप करण्यात आले.        यावेळी पुढे बोलताना आपल्या भाषणात डॉ. भरत मुंडे यांनी कविता सादर करत आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी यावेळी सांगितले की,डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका समाजाचे नेते नव्हते, तर ते संपूर्ण जगास...

मार्गदर्शक सूचना जारी

 उष्माघातापासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाचे आवाहन



मार्गदर्शक सूचना जारी

बीड , दि;  २६  ,(जिमाका ) उन्हाळ्यात तापमानात होणारी वाढ लक्षात घेता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने उष्माघातापासून बचावासाठी  मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षेचे उपाययोजना

तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाने पुरेसे पाणी प्यावे. शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ओआरएस (ORS), लस्सी, लिंबू पाणी, ताक आणि कैरीचे पन्हे यांसारख्या घरगुती पेयांचा वापर करावा.

 बाहेर पडताना हलके, पातळ आणि सच्छिद्र सुती कपडे वापरावेत. डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कापडाचा वापर करावा. दुपारी १२ ते ३ या वेळेत शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे. कष्टाची कामे पहाटेच्या वेळी उरकून घ्यावीत आणि कामाच्या ठिकाणी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी.घर थंड ठेवण्यासाठी पडदे आणि सनशेडचा वापर करावा. रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पाळीव प्राणी आणि गुरांना छावणीत ठेवावे व त्यांना पिण्यासाठी पुरेसे पाणी द्यावे.

चक्कर येणे, सतत घाम येणे, डोकेदुखी किंवा अशक्तपणा जाणवल्यास ही उष्माघाताची लक्षणे असू शकतात. अशा वेळी तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

 सावधगिरीच्या सूचना

 चहा, कॉफी, दारू आणि कार्बोनेटेड थंड पेये घेणे टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाऊ नका. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या पार्क केलेल्या वाहनात सोडू नका. तापमान जास्त असताना कष्टाची कामे टाळावीत. उन्हाच्या तीव्र कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे आणि स्वयंपाकघरात हवेशीर वातावरण ठेवावे.

जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अधिक माहितीसाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या सोशल मीडिया हँडलला (@SDMAMaharashtra) भेट द्यावी किंवा जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे पालन करावे. स्वतःचा आणि आपल्या कुटुंबाचा उष्माघातापासून बचाव करण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....