इमेज
संस्कार शिबिरांमुळे मूल्याधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य !- उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर  परळी वैजनाथ, दि. २-              आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धामुळे सर्वत्र चिंतेचे व अशांततेचे साम्राज्य पसरले असतानाच संस्कार शिबिरासारख्या प्रेरक उपक्रमांमुळे जगात प्रेम, सदाचार, दया, करुणा, सच्चारित्र्य, माणुसकी, सहिष्णुता आदी मानवी मूल्यांची जोपासना होऊन शांतता व सुख समृद्धी नांदू शकते, असे प्रतिपादन उपविभागीय अधिकारी श्री अरविंद लाटकर यांनी केले.         परळी येथून जवळच असलेल्या नंदागौळ मार्गावरील श्रद्धानंद गुरुकुल आश्रमात गेल्या आठ दिवसापासून सुरू असलेल्या "मानवता संस्कार व आर्य वीर दल प्रशिक्षण" शिबिराचा काल विविध कार्यक्रमांनी समारोप झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री लाटकर बोलत होते. अध्यक्षस्थानी आर्य समाज परळीचे प्रधान श्री जुगल किशोर लोहिया हे होते.यावेळी श्री हरिसिंह आर्य (दिल्ली), निवृत्त नायब तहसीलदार श्री बाबुराव रुपनर, उग्रसेन राठौर, रंगनाथ तिवार , प्रशांतकुमार शास्त्री, डॉ. मधुसूदन काळे, आचार्य सत्येंद्र...

 संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले-अभयकुमार ठक्कर



परळी वैजनाथ / प्रतिनिधी

परळी येथील उपजिल्हा रुग्णालयात आज संत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख तथा माजी नगराध्यक्ष अभयकुमार उर्फ पप्पू अण्णा ठक्कर यांच्या हस्ते संत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरुण गुटे, डॉ.  दिनेश कुरमे  तसेच रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभयकुमार ठक्कर म्हणाले की, संत तुकडोजी महाराजांनी आपल्या कीर्तन व ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे महान कार्य केले. त्यांनी स्वच्छता, व्यसनमुक्ती, ग्रामविकास आणि राष्ट्रभक्ती यांचे महत्त्व पटवून दिले. आजच्या काळात त्यांच्या विचारांची अधिक गरज असून समाजाने त्यांच्या आदर्शांचे पालन करून एक सुदृढ व सुसंस्कृत समाज निर्माण करावा.

तसेच त्यांनी सांगितले की, संत तुकडोजी महाराजांचे कार्य केवळ अध्यात्मिक नसून सामाजिक परिवर्तन घडविणारे होते. त्यांच्या शिकवणुकीतून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करणे हीच त्यांना खरी अभिवादन ठरेल असे श्री ठक्कर म्हणाले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....