इमेज
‘या’ तारखेला जाहीर होणार बारावीचा निकाल महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी- मार्च २०२६ मध्ये घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी ( २ मे) ला जाहीर हाेणार आहे. निकालाच्या (Career) प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रतिक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी १ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे. यंदा १५ लाख ३२ हजार ४८७ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुमारे २५ हजाराने वाढ झाली हाेती. राज्यातील ७ लाख ९९,७७३ विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली असून ३ लाख ८० हजार ६८२ विद्यार्थ्यांनी कला शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. तर वाणिज्य शाखेच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख २० हजार १५२ एवढी आहे. यंदा बारावीच्या परीक्षेसाठी ८ लाख २० हजार २२९ मुलांनी तर ७ लाख १२ हजार २४० मुलींनी नोंदणी करण्यात आली हाेती. त्याचप्रमाणे १८ ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांनी नोंदणी करण्यात आली हाेती.

 ​प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'प्रबोधनरत्न' पुरस्कार; परळीत  सत्कार



परळी ,प्रतिनिधी:

प्रख्यात सिने नाट्य लेखक आणि दिग्दर्शक प्रा. डॉ. सिद्धार्थ तायडे यांना राज्यस्तरीय 'एकता रंगकर्मी प्रबोधनरत्न पुरस्कार' जाहीर झाल्याबद्दल त्यांचा परळी येथे भव्य सत्कार करण्यात आला. परळी सिने नाट्य कलावंत संघटना व मित्रपरिवारातर्फे डॉ.सिद्धार्थ तायडे यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यासाठी या विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. कला आणि प्रबोधन या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेल्या कार्याची दखल या पुरस्काराद्वारे घेण्यात आली आहे.

यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून डॉ.सिद्धार्थ तायडे यांचे स्वागत व अभिनंदन केलेज्येष्ठ साहित्यिक व संपादकभीमयुगकार रानबा गायकवाड,प्रसिद्ध कवी व निवेदक बा. सो. कांबळे,सामाजिक कार्यकर्ते सुभाष वाघमारे, नवनाथ दाने, दत्ता मामा लांडे, मुख्याध्यापक शेख सर, शास्त्री कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....