इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:जगातील 26 टक्के नवे कोरोना रुग्ण भारतातून, चिंता वाढवणारी आकडेवारी




 *⭕जगातील 26 टक्के नवे कोरोना रुग्ण भारतातून, चिंता वाढवणारी आकडेवारी⭕*


  मुंबई : भारतात कोरोनाचा आलेख झपाट्याने वाढत आहे. एकूण रुग्णांची संख्या 31 लाखांवर गेली आहे. भारत हा तिसरा देश आहे जिथे 30 लाखाहून अधिक रुग्णांची पुष्टी झाली आहे. यापूर्वी अमेरिका आणि ब्राझीलमध्ये 30 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या एका आठवड्यात जगातील 26 टक्के प्रकरणे भारतात नोंदवली गेली आहेत.

 

वर्ल्डमीटरने दिलेल्या माहितीनुसार, संपूर्ण जगात कोरोना रूग्णांची संख्या 2 कोटी 38 लाखांपेक्षा जास्त आहे, ज्यामध्ये 8 लाख 17 हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. आतापर्यंत 1 कोटी 63 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत, तर सक्रिय रुग्णांची संख्या 66 लाखाहून अधिक आहे.

   24 ऑगस्ट रोजी जगात 2 लाख 13 हजार नवीन रुग्ण आढळले, त्याच दिवशी भारतात नवीन रूग्णांची संख्या 59 हजाराहून अधिक होती. त्याचप्रमाणे 23 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 10 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली, तर भारतात नवीन रूग्णांची संख्या 61 हजाराहून अधिक आहे.

 22 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 67 हजार रुग्ण संख्या नोंदवली गेली होती, तर एकट्या भारतात 70 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली होती. 21 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2 लाख 58 हजार प्रकरणे नोंदवली गेली, तर केवळ भारतात 69 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली. 20 ऑगस्ट रोजी संपूर्ण जगात 2.67 लाख प्रकरणे नोंदवली गेली, तर भारतात 68 हजार नवीन प्रकरणे नोंदवली गेली.

  संपूर्ण जगात येणाऱ्या चार रुग्णांपैकी एक रुग्ण भारतातला आहे. भारतातील एकूण रूग्णांची संख्या आता 31 लाख 67 हजारांच्या पलीकडे गेली आहे, ज्यामध्ये 58 हजाराहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 24 लाखाहून अधिक लोक बरे झाले आहेत. सध्या सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखाहून अधिक आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!