दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS:परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश* *परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*

 


*परळीच्या जलवैभवात अधिक वाढ, धनंजय मुंडे यांच्या पाठपुराव्यास यश*


*परळी सर्कल ऑफिस स्थलांतरित न होता गंगाखेड विभाग जोडून आणखी बळकटीकरणाचा जलसंपदा विभागाचा निर्णय*



परळी (प्रतिनिधी) : राज्य शासन जलसंपदा विभागाने नुकत्याच जारी केलेल्या शासन निर्णयानुसार परळी पाटबंधारे विभागाचे वैभव वाढणार असून परळी पाटबंधारे मंडळ कार्यालयास, माजलगाव कालवा विभाग क्रं ७ गंगाखेडसह एकूण ४ उपविभाग परळीस जोडून एकूण ४ विभाग आणि अतिरिक्त २९ उपविभागांचे कामकाज आता परळीतून चालणार आहे. यासाठी परळीचे आमदार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सातत्याने प्रयत्न केले असून तट प्रयत्नांना आता यश आले आहे.


राज्य शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयानुसार जायकवाडी प्रकल्पांतर्गत मंडळाकडे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना निम्न दुधना प्रकल्प नांदूर मध्यमेश्वर कालवा यासह विविध प्रलंबित कामे जलदगतीने पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा मानस असल्याने औरंगाबाद कार्यालयाने जायकवाडी प्रकल्पाचे मंडळ कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला आहे.


परळी उपविभागांतर्गत याआधी ३ उपविभाग होते आता एक विभाग जोडला आणि त्यातील ७ उपविभाग असे ४ विभाग आणि २९ उपविभाग आता परळी मंडळास जोडण्यात आले आहेत.


या अंतर्गत जायकवाडी मंडळाचे मुख्य कार्यालय औरंगाबाद येथून लातूर येथे स्थलांतरित करून लाभक्षेत्र विकास प्राधिकरण लातूर या नावाने नवीन मंडळ कार्यालय अस्तित्वात येणार आहे याअंतर्गत मंडळ कार्यालयाच्या विभाजनानंतर बीड पाटबंधारे प्रकल्प मंडळ परळी वैजनाथ याअंतर्गत पूर्वीचे ३ व गंगाखेड येथील नवीन १ असे ४ विभाग व २९ अतिरिक्त उपविभाग लाभक्षेत्र विकास प्राधिकरण बीड अंतर्गत ४ विभाग तसेच २४ उपविभाग कार्यालय आता परळी येथून कार्यान्वित करण्याचे आदेश या शासन निर्णयाअंतर्गत देण्यात आले आहेत.


पूर्वाश्रयीच्या भाजप सरकारने परळी येथील सिंचन भवन विभागीय कार्यालय पळवून लातूरला नेन्याचा घाट घातला होता परंतु धनंजय मुंडे यांनी यास त्या वेळी विरोध करत आपली भूमिका मांडली होती.  जलसंपदा विभागाअंतर्गत परळी तालुक्याचे वैभव वाढवणारा निर्णय घेतल्याबद्दल जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आभार मानले आहेत.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....