परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS: सोनपेठ,केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत .

 

केंद्र सरकारच्या अध्यादेशांचे शेतकऱ्यांकडुन स्वागत .

सोनपेठ दि.२४(प्रतिनिधी) केंद्र सरकारने शेती संबधाने काढलेल्या तीन अध्यादेशांचे शेतकऱ्यांनी व शेतकरी संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले व हे अध्यादेश कायद्यात रुपांतरीत करण्याची मागणी करण्यात आली.

देशातील शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य मिळावे तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य मिळावे या साठी शेतकरी संघटना गेली चाळीस वर्ष लढा देत आहे .या लढाईतील प्रमुख मागण्यापैकी एक शेतकऱ्यांना बाजाराचे स्वातंत्र्य असावे शेतकऱ्यांना आपला माल कोणत्याही बाजारात विकता यावा ही मागणी केंद्र सरकारने एक बाजार एक देश ही घोषणा करत शेतमालाचा बाजार सामान्य नागरीकांसाठी एका अध्यादेशा द्वारे खुला केला आहे. या मुळे शेतकरी आपला माल आता थेट विकू शकणार आहे .तसेच दुसऱ्या एका अध्यादेशामुळे शेतीमाल आवश्यक वस्तु कायद्याच्या बाहेर काढल्यामुळे सरकार आता शेतीमालाच्या किमंती नियंत्रीत ठेवणार नाही तसेच करार शेतीच्या अध्यादेशामुळे शेतीत गुंतवणूक वाढणार असल्याने थेट शेतीला फायदा होणार आहे .

हे तीन ही अध्यादेश शेती व शेतकऱ्यांसाठी फायद्याचे असल्याने केंद्र सरकारच्या या धाडसी अध्यादेशाचे शेतकरी संघटना व शेतकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले आहे. या संबधाने शेतकरी संघटनेच्या वतीने तहसीलदार डॉ आशिषकुमार बिरादार यांना निवेदन देण्यात आले . या वेळी शेतकरी संघटनेचे युवा तालुका अध्यक्ष सोमनाथ नागुरे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!