इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS:शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव -------------------------------

 ----------------

शरद पवार यांच्या सुरूवातीच्या काळातील परळीतील

सहकार्‍यांचा शरद पवार विचार मंचच्या वतीने गौरव

--------------------------------

बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांचा उपक्रम 

----------------



परळी वैजनाथ, (प्रतिनिधी)ः-

‘राजकीय प्रवासाच्या पाऊल वाटेवरील, प्रारंभीची साथ आपली...यशोशिखरावर घेऊन गेली सह्याद्रीच्या सुपूत्राला..!’ या शब्दात राष्ट्रवादी काँगे्रसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरूवात झाल्यानंतर त्यांच्या विचार आणि कार्यावर प्रभावित होऊन त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून काम करणार्‍या परळीतील सुरूवातीच्या काळातील पक्ष कार्यकर्त्यांचा शरद पवार विचार मंचच्या बीड जिल्हा शाखेच्या वतीने गौरव करण्यात आला.

 खा.शरदचंद्रजी पवार यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्ताने शनिवारी (दि.12) हा उपक्रम परळीत राबवण्यात आला. श्री पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरूवात झाल्यानंतर त्यांचे सहकारी कार्यकर्ते म्हणून येथे काम करणारे डॉ.सुरेश चौधरी, बाबुराव मुंडे, शिवाजीराव देशमुख पोहनेरकर, बाळासाहेब देशमुख, जनार्धनराव गाडे गुरूजी, श्री सिरसाट,सिराजोद्दीन मुल्ला, श्री तांदळे आदींचा त्यांच्या घरी जावून शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या उपक्रमाचे या मान्यवरांनी कौतुक तर केलेच शिवाय जुन्या आठवणींना उजाळा दिला. या उपक्रमाचे आयोजक शरद पवार विचार मंचचे बीड जिल्हाध्यक्ष श्रीनिवास देशमुख यांनी उपक्रमाबाबतची भूमिका स्पष्ट केली. यावेळी श्री देशमुख यांच्यासह विचार मंचचे शहराध्यक्ष श्रीकांत माने, लक्ष्मण कलमे, पत्रकार लक्ष्मण वाकडे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!