इमेज
बीड जिल्हयातुन 1599 प्रकरणे राष्ट्रीय लोक अदालतमध्ये निकाली बीड- आज दिनांक 9 मे 2026 रोजी बीड मुख्यालयात राष्ट्रीय लोकन्यायालयाचेउद्घाटन आनंद एल.यावलकर, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, बीड तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या हस्ते संपन्न झाले.   सदर उदघाटन कार्यक्रमास जिल्हा न्यायाधीश-1 व्ही.एच. पाटवदकर, जिल्हा न्यायाधीश-2 एस.आर.शिंदे, तदर्थ जिल्हा न्यायाधीश-2 आर.एम नेरलीकर मुख्य न्यायदंडाधिकारी पी.आर.शिंदे व इतर न्यायिक अधिकारी तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव डाॅ.वहाब ए.सय्यद, बीड मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, बीड जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस.जी.पिसुरे, उपाध्यक्ष आर.व्ही.देशमुख, सचिव सुभाष काळे तसेच त्यांचे सर्व पदाधिकारी, विधिज्ञ सदर उदघाटन कार्यक्रमास उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशावरूनआनंद एल. यावलकर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बीड यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 9 मे 2026 रोजी पार पडलेल्या लोक न्यायालयात बीड जिल्हयातुन एकूण. 1209 प्रकरणे तडजोडीने निकाली निघाली आहेत. बीड...

MB NEWS: *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*

 *सामाजिक जाणिवेचा उपक्रम : परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द*



परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

     परळी विकास मंचच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.सामाजिक जाणिवेचा उपक्रम राबवत २०१५ मध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या नावे ३० हजार रुपये मुदतठेव करण्यात आली होती.ही मुदत संपल्यानंतर आज मुदतठेवीचे धनादेश सुपूर्द करण्यात आले.



        शहरात अनेक पक्ष, संघटनेचे तरूण एकत्र येऊन राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून 12 जानेवारी 2012 रोजी परळीच्या सांस्कृतिक,सामाजिक व विकासाच्या जाणिवेतून अराजकीय संघटना परळी विकास मंचची स्थापना करण्यात आले.विकास मंचच्या माध्यमातुन शहरातील छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याची पहिली मागणी केली होती .शहरात बस स्थानक ते श्यामाप्रसाद मुखर्जी उडानपुलावर होणारे अपघात पाहून शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा विषय बाह्यवळण ( बायपास)रस्त्याची पहिली मागणी विकास मंचाच्या माध्यमातून करण्यात आली. तो आता होण्याच्या मार्गावर आहे.अशी अनेक प्रश्न उपस्थित करून परळीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. पूरग्रस्तांना मदत, शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नगदी स्वरूपात मदत व आज दोन कुटुंबातील लहान मुलींच्या नावावर कु. रोहिणी भगवान इचके टोकवाडी, मोहिनी गोविंद मुंडे पांगरी कॅम्प या पाल्यांना 30000/-रू ची राजस्थानी पतसंस्थेची एफ डी देण्यात आली FD करण्यात आली होती. त्याची मॅच्युरीटी पुर्ण झालेला धनादेश पत्रकार प्रा.रविंद्र जोशी व प्रा. प्रविण फुटके यांच्या हस्ते देण्यात आला.याप्रसंगी परळी विकास मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....