इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम

 समाजातील प्रत्येक नागरिकाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्यासाठी प्रबोधन अभियान 



शांती, एकात्मता आणी समाजाच्या प्रगतीसाठी या अभियानातून मोठा बदल होईल- मोहम्मद शफी फारोखी


परळी जमात-ए-इस्लामी हिंदचा उपक्रम 


परळी (प्रतिनिधी): 

समाजाला अज्ञान ,घृणा आणि भौतिकवादाच्या अंधकारातून वाचविणे तसेच शांती, एकात्मता आणि समाजाची प्रगती व्हावी या उद्देशाने जमात-ए- इस्लामी हिंद महाराष्ट्रातर्फे अंधारातून प्रकाशाकडे हे राज्यस्तरीय प्रबोधन अभियान २२ जानेवारीपासून राज्यभर राबविण्यात येणार आहे.


 यानिमित्ताने परळी येथील जिजामाता उद्यान परिसरातील फूड जंक्शन येथे पत्रकार परिषदेत जमात-ए-इस्लामी हिंदचे भारतीय समाज विभागाचे सहाय्यक सचिव मोहम्मद शफी फारूखी यांनी माहीती दिली. 


तसेच या अभियानातून इस्लाम धर्माविषयी सामान्य नागरिकांच्या मनातील गैरसमजुती दूर करण्यात येणार आहे.

कोरोना महामारीने भौतिकवादी लोकांचे डोळे उघडले आहे. या स्थितीमुळे त्यांचे सध्याचे विश्वास आणि कार्यशैली मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. म्हणून जीवन फक्त संपत्ती गोळा करण्याचे नाव नाही व भौतिक उद्देशांच्या परिपूर्तीचे नाव नाही. शेवटी विवेक आणि करुणेशिवाय कुठलेही सुख नाही.


२२ ते ३१ जानेवारी दरम्यान शहरातील प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयाला भेटी देणे, युवा व युवतींना माहीती देणे, वृद्धाश्रम व शहर व तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या धर्मगुरूंच्या भेटी, सामाजिक व राजकीय व्यक्तीच्या भेटी, शाळा- काॅलेजला भेटी, महिलांना विशेष मार्गदर्शन तसेच पुस्तक प्रदर्शन व डाॅ. ह. भ. प. रफीक पारनेरकर यांचे व्याख्यान होईल. या अभियानातून माणसाला अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचा प्रयत्न होणार असून शहरातील ५० हजार नागरिकांपर्यंत हा संदेश देण्यात येणार आहे.

यावेळी जमातचे शहराध्यक्ष सय्यद अन्वर, जिल्हाध्यक्ष सय्यद इफ्तेखार यांची उपस्थित होती.

सय्यद जाफर, सय्यद अफान, शेख मुदस्सीर, शेख अहमद यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार सय्यद सबाहत यांनी केले.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....