दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS: *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 *लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी*

 


परळी वैजनाथ दि.०४ (प्रतिनिधी)

            येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त "महिला शिक्षीका दिन" उत्साहात साजरा करण्यात आला.

               राणी लक्ष्मीबाई टाँवर चौक परिसरात असलेल्या लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनोद जगतकर, तर प्रा.डॉ. प्रविण दिग्रसकर, प्रा.नव्हाडे, प्रा.पि.एम.फुटके उपस्थित होते. सुरुवातीला क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना प्रा. डॉ. जगतकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवन कार्यावर प्रकाश टाकला. तसेच सावित्रीबाई फुले व महात्मा फुले यांचा त्याग इतर सर्व समाजकार्य करणाऱ्या समाजसुधारकां पेक्षा जास्त आहे. फुले दामपत्य जर समाजसुधारनेत आले नसते तर ते उद्योजक झाले असते.असे ही श्री.जगतकर यांनी सांगितले. गायत्री पुजारी व आफरिन शेख या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. प्रास्ताविक प्रा.नव्हाडे, सूत्र संचालन गायत्री केंद्रे, कुरेशी इरम फातेमा यांनी तर आभार वैष्णवी घायाळ हिने मानले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....