MB NEWS-वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न* *प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*

 *वीस दिवसानी वडखेलचा सुटला पाण्याचा प्रश्न*



*प्रशासनाच्या सामंजस्याच्या भुमीकेमुळे कायमचा प्रश्न मिटला*


*परळी वै.ता.८ प्रतिनीधी*

    वीस दिवसा पासुन बंद असलेला वडखेल चा पाणी पुरवठा प्रशासनाच्या सामंजस्य भुमीकेमुळे कायमचा सुटला आहे. शेतकऱ्यांच्या समक्ष रस्तयावरील दगड माती काडुण पाणी सोडण्यात आले. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.

     परळी तालुक्यातील वडखेल येथील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरी लगतच्या शेतकऱ्यांनी विहीरीच्या आजुबाजुला दगड व मातीचे ढिगारे टाकुण रस्ता अडविला होता. त्यामुळे गावकऱ्याचा मागील विस दिवसा पासुन पाणी पुरवठा बंद होता. याबाबत ग्रामस्थांनी बुधवारी (ता.५) ग्रामसेवकांकडे लेखी निवेदण देउन गावचा पाणी पुरवठा सुरू करण्याची मागणी केली होती. याच्या बातम्या सर्वत्र प्रसिध्द झाल्या होत्या. त्यामुळे प्रशासनाच्या शनिवारी (ता८) वतीने तलाठी डिगांबर साबने व ग्रामसेवक अविनाश तोटे यांनी वडखेल येथे जाउन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेउन समजाउन सांगीतले. शेतकऱ्यांनी चुक मान्य करूण तेथील दगड व मातीचे ढिगारे जेसीबीच्या सहाय्याने काढुण घेतले. मागील विस दिवसापासुन बंद असलेला पाणी पुरठा शनिवारी (ता.८) दुपारी दोन वाजता सुरू करण्यात आला. यावेळी सरपंच पिंटु देवकते, प्रकाश चव्हाण, चंद्रकांत देवकते, गोविंद देवकते, अंगद गंगने, गणेश देवकते, पवनकुमार बोडके व शेतकरी मनोहर देवकते हे उपस्थीत होते.

*सामंजस्यानी प्रश्न सुटला*

गावात कुठलाही वाद न होता पाण्याचा प्रश्न सुटल्याचा आनंद आहे. संबंधित शेतकरी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच व गावकऱ्यांनी सामंजस्यानी प्रश्न सोडविल्याचा खुप आनंद झाला. गावातील सर्वच प्रश्ने असाच पध्दतीने एकोप्याने सोडवावेत.

ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर (जेष्ठ पत्रकार)

ग्रामस्थ वडखेल

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करु नका !

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती

परळी वैजनाथ-सरपंच खून प्रकरण: आरोपीना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या चौघांना पोलीसांनी घेतले ताब्यात

परळीत लाचखोर कार्यकारी अभियंता पकडला !

धनगर तळ्याजवळ ...बोगद्यात घडली घटना

● परळी विधानसभा मतदारसंघात निवडणूक रिंगणात राहिलेले अकरा उमेदवार