MB NEWS-कोरोनामुळे दोन वर्षांपासून परळीचा धार्मिक माहोल झाला स्तब्ध;परळीकर भाविक 'मिस' करतायत वारी व वारकर्यांना

 आठवण व हुरहुर: परळीकरांसाठी जुलैचा पहिला आठवडा दिंड्या,पालख्या व हरिनामाच्या गजराने असायचा मंतरलेला !



 कोरोनामुळे दोन वर्षांपासून परळीचा धार्मिक माहोल झाला स्तब्ध;परळीकर भाविक 'मिस' करतायत वारी व वारकर्यांना  


परळी वैजनाथ /प्रतिनिधी:

        कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून पंढरपूर च्या आषाढी वारी वर बंदी आली.पायी दिंड्या ,पालखी सोहळे ,भजनानंद, हरिनामाच्या गजराने दुमदुमून जाणारे वातावरण हे सर्व बंद झाले.परळीसाठी हे कित्येक पिढ्यांपासून चालत आलेले वातावरण असल्यामुळे जुलै च्या पहिल्या आठवड्यात परळीकर नागरीक,भाविक स्तब्ध झालेला धार्मिक माहोल आठवुन हुरहूर व्यक्त करत आहेत.मध्यप्रदेश, विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश दिंड्या परळी मार्गे पंढरपूरकडे जातात त्यामुळे जुलैचा पहिला आठवडा याच दिंड्या,पालख्या व हरिनामाच्या गजराने मंतरलेला असायचा.कोरोनामुळे दोन वर्षांपासून परळीचा धार्मिक माहोल स्तब्ध झाल आहे.एकप्रकारे परळीकर भाविक वारी व वारकर्यांना 'मिस' करत आहेत.

          आषाढी वारीच्या पार्श्‍वभूमीवर प्रभु वैद्यनाथाच्या नगरीतून छोट्या-मोठ्या जवळपास ७६ पालख्यांचे आगमन परळी शहरात होते. या पालख्यांचे स्वागत परळीचे भाविक मनोभावे करतात.तसेच भाविकांचे श्रध्दास्थान असलेले विदर्भातील संतश्रेष्ठ गजानन महाराज, संत गुलाबराव महाराज या मोठ्यापालखीचे दोन मुक्काम परळीत असतात. औ.वि.केंद्राच्या शक्तीकुंज वसाहत येथे गजानन महाराज पालखी सोहळा दाखल झाल्यापासून मोठा उत्सव सुरू होतो. दुसऱ्या दिवशी परळीच्या मुख्यरस्त्यावरून पालखी मार्गस्थ होते आणि नागरीकांच्या उत्साहाला उधाण येते. वारकर्‍यांना अल्पोअपहार,फराळ, चहापाणी, भोजन ,संतपुजा अशी लगबग सुरू होते. दिंडीतील असलेल्या वारकर्‍यांच्या तोंडातून हरी मुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, गण-गण गणात बोते, ज्ञानोबा- तुकारामांच्या जयघोषाने वातावरण मंत्रुन जाते. तालुक्यातील वडगाव दा.वसाहत येथे आगमन झाल्या पासून ते शक्तीकुंज वसाहत परळी शहरालगत शक्तीकुंज वसाहत येथे मुक्कामासाठी आगमन झाल्यापासून दोन दिवस भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. 

 @@@@

   *७६ च्यावर दिंड्याचे परळीतून मार्गक्रमण.......*

       दरम्यान परळी मार्गे सुमारे ७६ च्यावर दिंड्यांचा वारीचा मार्ग आहे. प्रत्येकवर्षी दिंड्यांच्या संख्येत वाढ होत असते. प्रत्येक दिंडीच्या निवासाचे स्थळ अगोदरच निश्चित असते. तसेच मुक्कामाच्या पंगतींचेही मानकरी पूर्वनियोजित असतात. पंढरपूरकडे जाणाऱ्या अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात. परळी पंचक्रोशीत वारीमार्गावर या दिंड्यांचे स्वागत करण्याची मोठी परंपरा जपली गेलेली आहे.श्रद्धेने संतपूजन,संतदर्शन,वारकरी पूजन करण्याची पद्धत आपल्याकडे रूढ झालेली आहे.या अनुषंगाने पंढरपूर कडे जाणाऱ्या दिंड्यांचे नागरिक , भाविक मोठ्या उत्साहाने स्वागत करतात. वारकऱ्यांची आपापल्या परीने सेवा घडावी हीच त्यामागची पवित्र भावना असते. हे सामाजिक जाणिवेचे लक्षण आहे.

  @@@@

       *वैद्यनाथनगरी नगरप्रदक्षिणेला महत्त्व......*

       * दरवर्षी आषाढी वारीसाठी विदर्भ , मराठवाडा भागातील अनेक दिंड्या परळी मार्गे मार्गस्थ होतात. पंढरपूरच्या वारी मार्गा वरील बारा जोतिर्लिंगा पैकी एक असलेल्या वैद्यनाथ प्रभूच्या वास्तव्याने पुनीत झालेले परळी हे हरी-हर ऐक्य क्षेत्र असल्याने वारकरी बंधावात याचे विशेष महत्त्व मानले जाते. त्याचबरोबर संत जगमित्रनागा महाराजांचीही येथेच समाधी असून वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेही या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.त्यामुळे परळीत येणाऱ्या दिंड्या नगरप्रदक्षिणा करूनच मार्गस्थ होतात. अन्यत्र वारीमार्गावर कोणत्याच ठिकाणी नगरप्रदक्षिणा केली जात नाही.परळी व त्यानंतर पंढरपूर याठिकाणी दिंड्या नगरप्रदक्षिणा करतात.

 @@@

       गेल्या दोन वर्षांपासून परळीत येणाऱ्या पायी वार्या , दिंड्या येणं बंद झाल्यामुळे नेहमीचे धार्मिक वातावरण राहिले नाही.यामुळे चुकचुकल्या सारखे वाटते. या दिवसांमध्ये आवर्जून या धार्मिक वातावरणाची आठवण होते.

       - रामेश्वर कोकाटे महाराज

       अध्यक्ष, वारकरी मंडळ मराठवाडा.

@@@

     आमच्या अनेक पिढ्यांपासून दरवर्षी परळीत मुक्कामी असलेल्या दिंडीला पंगत असते. आमच्या परिवारासाठी हा खुप महत्वाचा प्रसंग असतो.परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे सगळं स्तब्ध झाले आहे त्यामुळे हुरहूर निश्चित आहे.

       - जितेंद्र नव्हाडे

       भाविक, परळी वैजनाथ.

   @@@

       कोरोनामुळे दोन वर्षांपासून परळीचा धार्मिक माहोल स्तब्ध झाल आहे.एकप्रकारे परळीकर भाविक वारी व वारकर्यांना 'मिस' करत आहेत. परळीतील वैद्यनाथ मंदिर सह सर्व मंदिरे बंद आहेत.त्यामुळे एकप्रकारे धार्मिक वातावरणाला भाविक भक्त व नागरिक मुकले आहेत.

        -भागवतमर्मज्ञ हभप सुरेंद्र महाराज उखळीकर

          भागवतकथा प्रवक्ते

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !