दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा!* *पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे*

 पंकजाताई मुंडे यांनी शेतकरी, नागरिकांच्या जागोजागी थांबून जाणून घेतल्या व्यथा!

पावसाअभावी पिकांचे नुकसान ; विमा मिळत नसल्याचेही मांडले गाऱ्हाणे


परळी ।दिनांक १४।  

ओबीसी मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी लातूर कडे जाताना भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी रस्त्यात जागोजागी थांबून परळी मतदारसंघातील शेतकरी व नागरिकांच्या समस्या, व्यथा जाणून घेतल्या. पावसा अभावी सध्या पिकांचे होत असलेले नुकसान आणि पीक विमा मिळत नसल्याबद्दल शेतकऱ्यांनी त्यांचेकडे गाऱ्हाणे मांडले.



   पंकजाताई मुंडे हया आज सकाळी परळीहून लातूरकडे जाण्यासाठी निघाल्या असता रस्त्यात ठिकठिकाणी त्यांनी शेतकरी व नागरिकांच्या भेटी घेतल्या. वरवटी येथे शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.पावसाअभावी हाताशी आलेले पीक जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकऱ्यांनी त्यांचेकडे चिंता व्यक्त केली. तसेच पीक विम्याबाबत ही यावेळी शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडले.यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याचा विश्वास त्यांनी शेतकऱ्यांना दिला. वरवटी नंतर पिंपळा धायगुडा, शेपवाडी, अंबाजोगाई, वाघाळा, राडी, सायगांव, सुगांव, भारज, बर्दापूर आदी मतदारसंघातील गावच्या शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. सर्व ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....