MB NEWS-परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान(Video)
परळीत गाढवांमुळे खळबळ;150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार: गाढवं चोरीची मोठी घटना ; पोलीसांना आव्हान
परळी वैजनाथ, प्रतिनिधी.....
अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून ओळख असलेल्या पाळीव गाढवांच्या अचानक गायब होण्याच्या घटनेने गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत.परळीत गाढवांमुळे खळबळ उडाली आहे.शहरातुन अंदाजे 150 गाढवं गायब झाल्याचा प्रकार समोर आला आहे.गाढवं चोरीची मोठी घटना समोर आल्याने या चोरीच्या प्रकरणात तपासाचे शहरातील पोलीसांना आव्हान निर्माण झाले आहे.
परळी शहरात पारंपरिक पद्धतीने भोई समाज आणि बेलदार समाजाकडे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर पाळीव गाढवं आहेत. विविध कामांमध्ये तसेच साहित्य वाहतूक करण्यासाठी या गाढवांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.बांधकामे, वीट उद्योग, मातीकाम,रेती काम मोठ्या जनसमुहाच्या उदरनिर्वाहसाठी वापरात येणाऱ्या जवळपास 150 गाढवांची चोरी झाली असल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.यामुळे गर्दभपालक चिंतातुर झाले आहेत. शहर पोलीस ठाण्यात तसेच संभाजी नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार अर्ज दाखल झाले आहेत. याप्रकरणी आता विविध सामाजिक संघटना पुढे येत असुन याप्रकरणी तपास करुन गर्दभपालकांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे.पोलीस प्राथमिक तपास करीत आहेत.
Video
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा