इमेज
  दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी दिपक गोविंद गित्ते  इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो येथे सिलेक्शन  परळी ( प्रतिनिधी) दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलचा विद्यार्थी चिरंजीव दीपक गोविंदराव गित्ते यांची मध्यप्रदेश भोपाल येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी इंटरनॅशनल 60 किलो वजन गटामध्ये ज्युडो या खेळामध्ये सिलेक्शन झाल्याबद्दल शाळेचे प्रेरणास्थान मार्गदर्शक मा. श्री .किरण गित्ते साहेब IAS सचिव : सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, उद्योग व वाणिज्य विभाग त्रिपुरा सरकार,  विवेकानंद युथ वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्षा : सौ.उषाताई किरण गित्ते , शाळेचे मुख्याध्यापक मा. श्री. श्रीकांत पाटील सर यांनी गोविंद गित्ते कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत .  या स्पर्धा मध्य प्रदेश भोपाल येथे इंटरनॅशनल या स्पर्धा दिनांक 12 मे 2026 रोजी होणार आहेत.           मराठवाड्यातील  नामांकित दिल्ली वर्ड पब्लिक स्कूलने आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांना खेळामध्ये महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झाले असून आता दीपक गोविंदराव गित्ते या विद्यार्थ्य...

MB NEWS-*वैद्यनाथ कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलित ! *शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला - पंकजाताई मुंडे*

 *वैद्यनाथ कारखान्याचा बाॅयलर प्रज्वलित !

*शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये यासाठी कारखाना सुरू केला - पंकजाताई मुंडे*

*कारखाना सर्वांचाच ; राजकारण करून अडथळा होणार नाही असेच सर्वांनी वागावे* 


परळी ।दिनांक ३०।

वैद्यनाथ साखर कारखाना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा आत्मा आहे, त्यांचे नांव याच्याशी जोडले गेले आहे. हा कारखाना सर्वाचाच आहे, शेतकऱ्यांमध्ये ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये म्हणून आर्थिक अडचणींचा सामना करत मी हा कारखाना सुरू करतेयं. तथापि, यात कुणीही  राजकारण करता कामा नये. अडचण निर्माण होणार नाही असेच सर्वांनी वागावे असे भाजपच्या राष्ट्रीय सचिव तथा कारखान्याच्या अध्यक्षा पंकजाताई मुंडे यांनी म्हटले आहे.



   वैद्यनाथ साखर कारखान्याचा २१ वा बाॅयलर अग्निप्रदिपन समारंभ पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते आज अतिशय साध्या पध्दतीने मोठया उत्साहात पार पडला, त्यावेळी सभासद शेतकऱ्यांसमोर त्या बोलत होत्या.

  पुढे बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, वैद्यनाथ साखर कारखाना हा सभासद, शेतकरी आणि कर्मचारी असा सर्वांचाच आहे. गेल्या कांही वर्षापासून साखरेचे दर कोसळल्याने व दुष्काळामुळे कारखाना आर्थिक संकटाला सामोरा जात आहे, त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला, त्यांचे मनोबल खचू नये आणि कारखाना सुरू व्हावा यासाठी 'आऊट ऑफ वे' जाऊन मी प्रयत्न केले. आता सर्व अडचणींवर  मात करून कारखाना सुरू करत आहे.      या भागातील शेतकऱ्यांच्या मनात ऊसासाठी कुठेही हात जोडण्याची भावना निर्माण होऊ नये केवळ यासाठीच गळीत हंगाम सुरू केला असल्याचे पंकजाताई म्हणाल्या. 


*राजकारण करून अडथळा आणू नका*

-------------

राजकारणाच्या मंचावर राजकारण करा पण ऊसात राजकारण करून वैद्यनाथच्या शेतकऱ्यांना कृपा करून अडचणीत आणू नका असं पंकजाताई म्हणाल्या. कारखान्यात माझा कसलाही स्वार्थ नाही, मुंडे साहेबांचे नांव याच्याशी जोडले गेलेले आहे. करायची असेल तर मदत करा पण अडचण येईल असं काही करू नका, नाही तर सगळ्या अफवांचा परिणाम शेतकऱ्यांवर होईल. ज्या कारखान्याने आपल्याला वैभव मिळवून दिले, त्याला सर्वांनी मिळून उभा केलं पाहिजे. यंदाचा गळीत हंगाम निर्विघ्नपणे पार पाडा आणि जास्तीत जास्त ऊस गाळपास आणून सहकार्य करा असे आवाहन करून भविष्यात येणाऱ्या अडचणींना सर्व मिळून सामोरे जाऊ असे पंकजाताई मुंडे म्हणाल्या.


   प्रारंभी कारखान्याचे संचालक शिवाजीराव गुट्टे यांच्या हस्ते सकाळी सपत्नीक बाॅयलर संचाची विधीवत पूजा करण्यात आली. कार्यक्रमास माजी आमदार तथा संचालक आर टी देशमुख, वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष विनोद सामत, उपाध्यक्ष रमेश कराड, भाजपचे तालुकाध्यक्ष सतीश मुंडे, कारखान्याचे संचालक सर्वश्री श्रीहरी मुंडे, व्यंकटराव कराड, त्रिंबकराव तांबडे, गणपत बनसोडे, श्रीराम मुंडे, कार्यकारी संचालक जी पी एस दीक्षितूलू  आदींसह सभासद शेतकरी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....