दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते

 शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पिक विमा व अनुदान रक्मेतुन बॅंकांनी पिक कर्जाची रक्कम कपात करू नये अन्यथा आंदोलन-राजेश गित्ते 

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

शेतकरी गेली चार वर्ष निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक अडचणीत सापडला आहे.या वर्षी ही शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने आपल्या शेतात कर्ज घेऊन पेरणी केली . पिक चांगले येऊन उत्पादन चांगले होईल व आपली आर्थिक परिस्थिती सुधारेल असे वाटत असताना अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले व तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या लहरी पणामुळे आर्थिक नुकसान झाले.

.शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मदत व्हावी यासाठी अनुदान व २५टक्के पिक विमा रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केली आहे.शेतकरी यांना वाटले या रकमेतून आर्थिक हातभार लागेल.पण जेव्हा शेतकऱी बैंकेत गेले तेव्हा त्यांच्या खात्यात जमा झालेल्या रक्कमेतून पिक कर्जाची रक्कम कपात करण्यात आली होती .

आज राजेश गित्ते यांनी शेतकरी आणि विविध गावचे सरपंच यांना सोबत घेऊन स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र शाखा परळी वैजनाथचे मेनेजर यांना निवेदन देण्यात आले व तात्काळ कपात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून पुढील काळात रक्कम कपात करण्यात येऊ नये असे निवेदनात म्हटले आहे. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन बैंके समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा भाजपा नेते राजेश गित्ते यांनी दिला आहे.

या निवेदनावर मा प समिती सदस्य मारोतराव फड, नंदनंज सरपंच अनिल गुट्टे,मिरवट सरपंच धुराजी साबळे, मिरवट चेअरमन भरतराव इंगळे, मिरवट उपसरपंच रामेश्वर महाराज इंगळे, मांडवा उपसरपंच अंगदराव नागरगोजे , मांडवा युवा नेते कारभारी मुंडे, दशरथ गिते, माऊली आंधळे, भास्कर गिते आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....