इमेज
  अहिल्यानगर ते बीड राज्य मार्गाच्या रुंदीकरणासाठी ९६६ कोटी रुपयांना मंजुरी ​अहिल्यानगर ते बीड या प्रमुख राज्य मार्ग क्र. १६ च्या सुधारणा व रुंदीकरणासाठी राज्य शासनाने ९६६ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. आमदारांचे स्वीय सहाय्यक विनोद रोडे यांनी यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे. ​अहिल्यानगर ते बीड दरम्यानचा सुमारे ९६ किलोमीटर लांबीचा हा प्रमुख राज्य मार्ग अनेक वर्षांपासून अत्यंत धोकादायक आणि वळणावळणाचा बनला होता. यामुळे या मार्गावर वारंवार अपघात घडत होते. वाहनचालक, प्रवासी आणि स्थानिक नागरिकांकडून या रस्त्याच्या सुधारणेची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर आमदार धस यांनी विविध स्तरांवर प्रयत्न केले होते. ​राज्य शासनाने या आश्वासनाची पूर्तता करत टाकळी काझी ते बीड दरम्यान किमी १३/१०० ते १०९/७०० या टप्प्यातील संपूर्ण रस्त्याच्या सुधारणा कामासाठी हा निधी मंजूर केला आहे. या अंतर्गत धोकादायक वळणांचे सरळीकरण करणे, रस्त...

MB NEWS-लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ !

 लोकनेत्याच्या जयंतीदिनी वैद्यनाथ कारखान्याच्या गळीत हंगामाला ना. पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते होणार शुभारंभ !

परळी वैजनाथ  ...

        वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ व्या  गळीत हंगामाचा शुभारंभ लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंतीदिनी रविवारी (दि.१२ डिसेंबर) कारखान्याच्या अध्यक्षा  पंकजा मुंडे यांच्या हस्ते  होणार आहे. 

       वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. कारखाना पुर्ण क्षमतेने चालवून कार्यक्षेत्रातील सर्व ऊसाचे गाळप  करण्याची व्यवस्था करण्यात आली असून तशी यंत्रणा उभी करण्यात आली आहे. या गळीत हंगामाचा शुभारंभ रविवार  दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११.१५ वाजता कारखान्याच्या चेअरमन पंकजाताई मुंडे यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे.  वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभ कार्यक्रमाला ऊस उत्पादक शेतकरी, ऊसतोड मुकादम, मजुर व नागरिकांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कारखान्याच्या  वतीने करण्यात आले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट