इमेज
  परळीजवळील चांदापूर तलावात बुडालेल्या युवकाचा दोन दिवसांनंतरही शोध लागेना; शोधकार्य युद्धपातळीवर सुरू परळी वैजनाथ: प्रतिनिधी... परळी शहराजवळील चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेलेला सुमित कलशेट्टी (वय ३७, रा. सुर्वेश्वर नगर, परळी वैजनाथ) हा युवक पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तलावात बुडाला. या दुर्दैवी घटनेला तब्बल दोन दिवस उलटून गेले आहेत. मात्र, अद्यापही या युवकाचा कोणताही पत्ता लागलेला नाही. स्थानिक प्रशासन आणि नागरिकांच्या वतीने तलावात शोधकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.      सुमित कलशेट्टी हे मंगळवारी (दि. २३ जून) सकाळी चांदापूर तलावात पोहण्यासाठी गेले होते. पोहत असताना अचानक पाण्याचा अंदाज चुकल्यामुळे ते तलावाच्या खोल भागात गेले आणि बेपत्ता झाले. ते बराच वेळ बाहेर न आल्याने उपस्थित नागरिकांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि प्रशासकीय पथकाने तातडीने तलावाकडे धाव घेतली. गेल्या दोन दिवसांपासून स्थानिक  आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने तलावाच्या कानाकोपऱ्यात शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही. या अत्यंत दुर्दैवी आण...

MB NEWS-*रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट* 🕳️ *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी निवेदन*

 *रेल्वे प्रश्नांसाठी खा.डाॅ.प्रितम मुंडे यांनी घेतली रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सुनीत शर्मा यांची भेट*



🕳️  *नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन*

परळी वैजनाथ, प्रतिनिधी....

        रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री.सुनीत शर्मा यांची काल दिल्लीतील रेल्वे भवन येथे भेट घेतली व बीड जिल्ह्यातील रेल्वे विषयक समस्यां संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.


जिल्ह्यातील रेल्वेमार्गात असलेले पूल आणि त्याखालून जाणाऱ्या रस्त्यांच्या बांधणीत असलेल्या तांत्रिक त्रुटींमुळे स्थानिक नागरीकांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो आहे. यासंदर्भात मी संबंधितांना वेळोवेळी सूचना दिल्या आहेत. रेल्वे विभागाच्या वरिष्ठ पातळीहुन देखील याविषयी सूचना देण्यात याव्यात, जेणेकरून नागरिकांच्या अडचणींची गांभीर्याने दखल घेतली जाईल आणि त्यांचे तत्परतेने निराकरण होईल असे श्री.शर्मा यांना सूचित केले.


तसेच नांदेड-बेंगलोर हंपी एक्सप्रेस, हैदराबाद-औरंगाबाद एक्सप्रेस, नांदेड-पनवेल एक्सप्रेस या जलद रेल्वे गाड्यांना  घाटनांदूर रेल्वे स्थानकावर थांबा देण्यासाठी  निवेदन दिले.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट