MB NEWS-शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते.
शेतकऱ्यांना शेतीसाठी होणारा विज पुरवठा योग्य वेळेत करावा-राजेश गित्ते
परळी वैजनाथ, प्रतिनिधी...
सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू आहे.शेतकरी रब्बी पिके हरभरा, गहू, ज्वारी आदि पिकांना पाणी देण्यात मग्न आहेत.विजमंडळाने गेल्या महिन्यात ट्रान्स्फर बंद केल्या मुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे व रब्बी पिके धोक्यात आली आहेत.शेतकरी अडचणीत असताना ही त्यांनी विज मंडळाकडे पैसे भरून ट्रान्स्फर चालू करून घेतले आहेत.परंतु विज मंडळ शेतीसाठी होणारा विज पुरवठा रात्री उशिरा १२नंतर देत असल्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी अडचण निर्माण होत आहे.सध्या खुप थंडी असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी त्रास होत आहे.तरी विज मंडळाने शेतीसाठी होणारा विज पुरवठा याची वेळ बदलून दयावी अशा मागणीचे निवेदन शेतकऱ्यांच्या वतीने भाजपा नेते राजेश गित्ते यांच्या सह शेतकऱ्यांनी उप कार्यकारी अभियंता आंबाडकर साहेब यांना देण्यात आले या निवेदनावर नंदनंज सरपंच अनिल गुट्टे, शेतकरी नेते बालासाहेब गिते, अवधूत लांडगे, कारभारी गिते, प्रदिप गिते आदि शेतकऱ्यांच्या स्वाक्षरी आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा