परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले

 परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले



परळी वैजनाथ, प्रतिनिधी..

         बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. परळीतही वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.वीज वितरण च्या नियोजनाची माहितीही दिली जात नाही.नागरिकांचे वीज गुल होण्याबाबत निट उत्तरं देऊन साधं समाधानही केलं जातं नाही.त्यामुळे नागरिकांत प्रचंड चीड, संताप व असंतोष निर्माण झाला आहे.

     अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. लोडशेडिंग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे.विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत. विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन (इमर्जन्सी) करावे लागत आहे. उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा  प्रयत्न असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

       दररोज वीज वारंवार खंडित होत आहे. शहरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.ऐन उन्हाळ्यात हाल सोसावे लागत असल्याने नागरीकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!