MB NEWS-परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले
परळीत ऐन उन्हाळ्यात वारंवार वीज गुल; नागरिक वैतागले
परळी वैजनाथ, प्रतिनिधी..
बीड जिल्हा आता भारनियमनाच्या खाईत लोटला गेला आहे. परळीतही वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिक वैतागले आहेत.वीज वितरण च्या नियोजनाची माहितीही दिली जात नाही.नागरिकांचे वीज गुल होण्याबाबत निट उत्तरं देऊन साधं समाधानही केलं जातं नाही.त्यामुळे नागरिकांत प्रचंड चीड, संताप व असंतोष निर्माण झाला आहे.
अचानकपणे लोडशेडिंग सुरू करण्यात आल्याने जनता हैराण झाली आहे. लोडशेडिंग सुरू झाल्याने ऐन उन्हाळ्यात लोकांचा घाम निघत आहे.विशेष म्हणजे रेग्युलर वीजबिल भरणाऱ्या लोकांना हा त्रास सहन करावा लागत असल्याने लोक वीज मंडळाच्या नावाने शिमगा करत आहेत. विजेच्या मागणीत अचानकपणे प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे उपलब्ध वीज आणि तुटीमुळे महावितरणला आपत्कालीन भारनियमन (इमर्जन्सी) करावे लागत आहे. उन्हाळा असल्याने वीजेची मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे इर्मजन्सी लोडशेडींग केल्याशिवाय पर्याय नाही. कुठल्याही क्षणी वीज जावू शकते. फिडरवाईज चक्रीप्रमाणे लोडशेडींग करण्यात येऊन ग्राहकांना वीज पुरवठा करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.
दररोज वीज वारंवार खंडित होत आहे. शहरातील नागरिकांना उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक वैतागले आहेत.ऐन उन्हाळ्यात हाल सोसावे लागत असल्याने नागरीकांत प्रचंड रोष निर्माण झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा