परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल

 अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल



संजय बियाणी यांच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करा- पंकजा मुंडे 


अंबाजोगाई ।दिनांक ०८।

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या करून फरार होणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. संतप्त जनभावना लक्षात घेऊन कारवाई करा असेही त्यांनी म्हटले आहे.

Click: *Live Ambajogai -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण*

   बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परळी येथे आणि आज अंबाजोगाईत व्यापारी वर्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन दिले. आज अंबाजोगाई येथे या मोर्चाची दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी ही मागणी केली. बियाणी यांची हत्येने क्रौर्याची परिसिमा गाठली असल्याचे त्या म्हणाल्या.

 राज्यात कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारांनी धाब्यावर बसवली आहे, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. बियाणी यांच्या हत्येने समस्त व्यापारी वर्ग संतापला असून आपल्या भावनांना मोर्चाद्वारे वाट मोकळी करून देत आहे. पोलिसांना अजुनही हल्लेखोर सापडले नाहीत ही शरमेची बाब आहे. सरकारने या संतप्त जनभावना लक्षात घेऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करून   कडक कारवाई करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!