दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS-अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल

 अंबाजोगाईतील व्यापाऱ्यांच्या मोर्चाची पंकजाताई मुंडेंकडून दखल



संजय बियाणी यांच्या हल्लेखोरांना तातडीने अटक करा- पंकजा मुंडे 


अंबाजोगाई ।दिनांक ०८।

नांदेड येथील बांधकाम व्यावसायिक संजय बियाणी यांची दिवसाढवळ्या हत्या करून फरार होणाऱ्या आरोपींना तातडीने अटक करा अशी मागणी भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटत असून व्यापारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. संतप्त जनभावना लक्षात घेऊन कारवाई करा असेही त्यांनी म्हटले आहे.

Click: *Live Ambajogai -भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचे भाषण*

   बियाणी यांच्या हत्येच्या निषेधार्थ काल परळी येथे आणि आज अंबाजोगाईत व्यापारी वर्गाने मोर्चा काढून सरकारला निवेदन दिले. आज अंबाजोगाई येथे या मोर्चाची दखल घेत पंकजाताई मुंडे यांनी ही मागणी केली. बियाणी यांची हत्येने क्रौर्याची परिसिमा गाठली असल्याचे त्या म्हणाल्या.

 राज्यात कायदा व सुव्यवस्था गुन्हेगारांनी धाब्यावर बसवली आहे, त्यामुळेच अशा घटना घडत आहेत. बियाणी यांच्या हत्येने समस्त व्यापारी वर्ग संतापला असून आपल्या भावनांना मोर्चाद्वारे वाट मोकळी करून देत आहे. पोलिसांना अजुनही हल्लेखोर सापडले नाहीत ही शरमेची बाब आहे. सरकारने या संतप्त जनभावना लक्षात घेऊन हल्लेखोरांना तातडीने अटक करून   कडक कारवाई करावी अशी मागणी पंकजाताई मुंडे यांनी केली आहे.

Click;*अंबाजोगाईतील ऊस व सोयाबीन उत्पादक शेतकरी मेळाव्यातील पंकजा मुंडे यांचे संपूर्ण भाषण.* _MB NEWS ला नक्की Subscribe करा._ 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....