MB NEWS-झालं नामांतर :आता संभाजीनगर आणि धाराशिव...ठराव मंजूर
झालं नामांतर :आता संभाजीनगर आणि धाराशिव...ठराव मंजूर
शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राज्यात राजकीय भूकम्प आला.शिंदे आणि शिवसेना यांच्यातील वाद सर्वोच्च न्यायालयात गेला.न्यायालयाने 12 जुलै पर्यंत बंडखोर आमदारांना दिलासा दिला.त्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल यांची भेट घेत सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला.
रात्री उशिरा राज्यपालांनी ठाकरे सरकारला 30 जून रोजी विशेष अधिवेशनात विश्वास दर्शक ठराव मांडण्याचे आदेश दिले.त्यानंतर या विरोधात शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली आहे.
दरम्यान आज होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत औरंगाबाद चे नामकरण संभाजीनगर, उस्मानाबाद चे धाराशिव करण्याचा ठराव मांडला.हे ठराव मंजूर करण्यात आले आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा