परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

 *नागापूरचा ट्रान्सफॉर्मर दोन दिवसात बसविणार!*

*पंकजाताई मुंडेंची वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांना सूचना ; परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली होती व्यथा*


परळी ।दिनांक ३१। 

नागापूर येथील ३३ केव्ही उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मर येत्या दोन दिवसांत बसविण्यात येणार असून परिसरातील शेतकरी व वीज ग्राहकांची समस्या दूर होणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांनी गाऱ्हाणे मांडल्यानंतर त्यांनी वीज अधिकाऱ्यांना तातडीने सूचना देऊन  ट्रान्स्फॉर्मर त्वरित बसविण्यास सांगितले आहे.  


 तालुक्यातील नागापूर वीज  उपकेंद्रातील एक ट्रान्सफॉर्मर गेल्या दीड महिन्यांपासून  दुरुस्ती विना बंद आहे तर दुसरा जळाल्यामुळे बंद आहे, त्यामुळे नागापूर सह परिसरातील बहादूरवाडी, डाबी, दौनापूर, वानटाकळी ,अस्वलंबा, मांडखेल, नागपिंपरी, तडोळी, माळहिवरा, गोपाळपूर, आदी गावातील शेतकरी वीजेविना त्रस्त आहेत.सध्या गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिके वाळत  आहेत. वीज नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे परिणामी उत्पन्नावर परिणाम होणार आहे. शेतामध्ये ऊस, सोयाबीन, कापूस, हरभरा, उडीद, मूग, ज्वारी, बाजरी आदी पिके असून पाण्याविना त्याचे अतोनात नुकसान होत आहे.


*शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा*

----------------

यासंदर्भात परिसरातील शेतकऱ्यांनी पंकजाताई मुंडे यांचेकडे तक्रार करताच त्यांनी वीज वितरणचे मुख्य अभियंता लातूर व बीडच्या अधीक्षक अभियंत्यांना  सूचना करून ताबडतोब ट्रान्स्फॉर्मर बसविण्यास सांगितले. पुढील दोन दिवसात हा ट्रान्स्फॉर्मर बसविण्याचा शब्द अधिकाऱ्यांनी पंकजाताईंना दिला आहे. लवकरच ही समस्या दूर होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

••••

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!