दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न

इमेज
  चैत्यभूमी दादर येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. १२ मे ते २१ मे २०२६ दरम्यान होणार संपन्न बीड ,प्रतिनिधी : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, चैत्यभूमी दादर (पश्चिम), मुंबई येथे विशेष श्रामणेर व बौद्धाचार्य धम्म प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, हे शिबिर दि. १२ मे ते २१ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे. बौद्ध धम्माचा सखोल अभ्यास करण्याची इच्छा असलेल्या विविध समाजातील धर्मांतरित बौद्ध बांधवांसाठी हे विशेष शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सत्यशोधक ओबीसी परिषद, सत्यशोधक समाज महासंघ, चर्मकार संघ, अखिल भारतीय धम्म महासंघ, प्रजासत्ताक जनता परिषद तसेच इतर विविध माध्यमांतून धर्मांतरित झालेल्या ओबीसी, पूर्वाश्रमीचे मातंग, वाल्मिकी, चर्मकार, ढोर समाजातील बौद्ध बांधवांना या शिबिरात सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय डॉ. भीमराव य. आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच संस्थेचे ट्रस्टी व राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा मुंबई केंद्रीय कार्यालय प्रमुख आद. अॅड. डॉ. एस. के. भंडारे यांच्या सल्ल्याने या शिबिराचे आय...

MB NEWS- *धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात* *रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी*

 *धनंजय मुंडेंच्या नेतृत्वात परळीत राष्ट्रवादी आपल्या दारी अभियानास पुन्हा सुरुवात*



*रविवारी धनंजय मुंडे देणार प्रभाग क्र. 3 मध्ये गृहभेटी*


परळी (प्रतिनिधी) - परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माजी मंत्री आ. धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या 'राष्ट्रवादी आपल्या दारी, विकासाची प्रभागफेरी' या अभियानास रविवारपासून पुन्हा सुरुवात होत असून, धनंजय मुंडे हे त्यांच्या सहकाऱ्यांसह शहरातील नवीन प्रभाग क्र. 3 मधील नागरिकांच्या भेटी घेऊन संवाद साधणार आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या या अभियानास परळी वासीयांनी उत्तम प्रतिसाद दिला होता. धनंजय मुंडे हे त्यांचे सहकारी, पदाधिकारी व स्थानिक प्रशासकीय कर्मऱ्यांसह घरोघरी होऊन नागरिकांशी संवाद साधतात, यावेळी नागरिकांच्या लहान मोठ्या समस्यांना घरपोच व्यासपीठ मिळत असल्याने ही प्रभाग फेरी लोकप्रिय ठरत आहे. 


मध्यंतरी घोषित झालेली आचारसंहिता व संततधार पाऊस यामुळे या अभियानास काही काळ खंड पडला होता, मात्र रविवार (दि. 7) पासून पुन्हा या अभियानास सुरुवात होत असून, सकाळी 8 वा. सर्व पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक आदींनी उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव भैय्या धर्माधिकारी यांनी केले आहे.


--------------------------------------------------------

- video news-



--------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

Video News :



-------------------------------------------------------

Video News :


-------------------------------------------------------

------------------------------------------------------










टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

Accident.....

पती-पत्नीतील वादाने गेला जीव.....

संभाजीनगर पोलीसांची तत्पर कारवाई....