इमेज
ना.पंकजा मुंडे यांची भेट घेऊन राहूल केंद्रे यांनी घेतले आशीर्वाद परळी वैजनाथ दि. २३       नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणूकीत अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आलेल्या अश्विनी केंद्रे यांचे पती राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत राज्याच्या पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री ना. पंकजा मुंडे यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताईंनी राहूल व आश्विनी यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.     नगरपरिषद निवडणूकीत शहरातील प्रभाग क्रमांक ७ अ मधून अपक्ष उमेदवार आश्विनी राहूल केंद्रे हया विजयी झाल्या, त्यांना १७०६ एवढी मते मिळाली. या विजयाबद्दल राहूल केंद्रे यांनी आज मुंबईत ना. पंकजाताईंची रामटेक निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद घेतले. ना. पंकजाताई यांनी यावेळी राहूल यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. केंद्रे यांच्या समवेत यावेळी राम तोष्णीवाल, आकाश मुंडे उपस्थित होते . ••••

MB NEWS-●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

 शेतकऱ्यांच्या प्रश्नी जिल्हाधिकारी कार्यालयावर शुक्रवारी आक्रोश आंदोलन

●अन्यायकारक निर्णयाविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

परळी / प्रतिनिधी


जून ,जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने जिल्ह्यातील 63 मंडळापैकी 16 मंडळात नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम देण्यात येत असल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून या प्रश्नी बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने शुक्रवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांनी केले आहे.


बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय सत्र या ही वर्षी थांबण्याचे चिन्ह दिसून येत नसून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी नापिकी ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाचीला पुजली आहे.या परिस्थितीत देखील जून,जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व लगेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड यामुळे शासनाकडून अंतरिम नुकसान भरपाई आणि पीक विम्याची 25 टक्के अग्रीम देण्यासाठी 63 पैकी केवळ 16 महसूल मंडळात नुकसान झाल्याचे सांगत उर्वरित बीड जिल्ह्यात काही ही नुकसान झाले नसल्याचे निकष लावून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.


शेतकऱ्यांमध्ये शासन व पीक विमा कंपनीच्या या अन्यायकारक निर्णयामुळे प्रचंड संताप निर्माण झाला असून समाज माध्यमातून यावर अनेक शेतकरी, शेतकरी पुत्र आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंतरिम नुकसान भरपाई द्यावी व 25 टक्के पीक विमा अग्रीम द्यावा या मागणीसाठी बीड जिल्हा किसान सभा शुक्रवार दि 16 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून  या प्रश्नी शासन ,प्रशासन व पीक विमा कंपनीचे लक्ष्य वेधून घेणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष एड.अजय बुरांडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली असून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी मोठा संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.

टिप्पण्या

  1. काय ती अतिवृष्टी,
    काय ती पावसाची दडी,
    काय ते अनुदान,
    काय त्यो अग्रीम

    बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा ओके कार्यक्रम लावलाय


    #अग्रीम_द्या
    #अनुदान_द्या
    #नेत्यांचा_निषेध
    #शेतकरी_उसळणार

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!