MB NEWS-अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार

 *शेतकऱ्यांच्या प्रश्नी आक्रोश आंदोलन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे - कॉ.मुरलीधर नागरगोजे , कॉ.पांडुरंग राठोड*



●अन्यायकारक निर्णयाविरोधात उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांचा एल्गार


परळी / प्रतिनिधी


जून ,जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी व ऑगस्ट महिन्यातील पावसाच्या खंडामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असताना शासनाने जिल्ह्यातील 63 मंडळापैकी पाहिले 16 मंडळात नंतर 31 मंडळात नुकसान भरपाई व पीक विमा कंपनीकडून 25 टक्के अग्रीम देण्यात येत असल्याने उर्वरित नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये शासनाच्या निर्णयाविरोधात प्रचंड संताप निर्माण झाला असून या व इतर प्रश्नी बीड जिल्हा किसान सभेच्यावतीने उद्या शुक्रवार दि 16 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून या मोर्चात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कॉ. कासीराम सिरसाट, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.दत्ता डाके,कॉ.जगदीश फरताडे यांनी केले आहे.


बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील अन्याय सत्र या ही वर्षी थांबण्याचे चिन्ह दिसून येत नसून कधी अतिवृष्टी, कधी दुष्काळ, कधी नापिकी ही जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या पाचीला पुजली आहे.या परिस्थितीत देखील जून,जुलै महिन्यात जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी व लगेच ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड यामुळे शासनाकडून अंतरिम नुकसान भरपाई आणि पीक विम्याची 25 टक्के अग्रीम देण्यासाठी 63 पैकी केवळ 16 महसूल मंडळात नंतर 31 महसूल मंडळात नुकसान झाल्याचे सांगत उर्वरित बीड जिल्ह्यातील महसूल मंडळात काही ही नुकसान झाले नसल्याचे निकष लावून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडण्यात आले आहे.


शेतकऱ्यांमध्ये शासन व पीक विमा कंपनीच्या या अन्यायकारक निर्णयामुळे प्रचंड संताप निर्माण झाला असून समाज माध्यमातून यावर अनेक शेतकरी, शेतकरी पुत्र आपला आक्रोश व्यक्त करीत आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अंतरिम नुकसान भरपाई द्यावी व 25 टक्के पीक विमा अग्रीम द्यावा या मागणीसाठी बीड जिल्हा किसान सभा शुक्रवार दि 16 रोजी मा.जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करून या प्रश्नी शासन ,प्रशासन व पीक विमा कंपनीचे लक्ष्य वेधून घेणार असून  जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या न्याय व हक्कासाठी मोठा संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन किसान सभेचे जिल्हा सचिव कॉ.मुरलीधर नागरगोजे, कासीराम सिरसाट, कॉ.पांडुरंग राठोड,कॉ.दत्ता डाके,कॉ.जगदीश फरताडे यांनी केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !