MB NEWS- मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना धनंजय मुंडेंची भावूक पोस्ट

धनंजय मुंडेंची सरकारला भावनिक साद !

अन्नदाता बळीराजा संकटाने मोडून पडलाय, त्याला सरकारच्या आधाराची गरज आहे - धनंजय मुंडेंची भावुक पोस्ट


परळी (दि. 15) - मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे. मराठवाड्यातील पावसाने निर्माण केलेल्या या विदारकदृश्याची पाहणी करायला या असे नम्र आवाहन माजी मंत्री तथा आमदार धनंजय मुंडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.


सोयाबीनचे खळे सुरू असताना आलेल्या तुफान पावसामुळे एक शेतकरी कुटुंब पाण्यात भिजत असलेले सोयाबीन गोळा करून टोपलीत भरतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हाच व्हिडिओ धनंजय मुंडे यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केला असून पाण्यात वाहणारी सोयाबीन गोळा करताना व काळ्या पडलेल्या कापसाच्या एका एका झुडपाकडे पुन्हा पुन्हा वळून बघणाऱ्या बळीराजाला पाहून नक्कीच तुमच्याही पोटात गोळा येईल; असेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना उद्देशून म्हटले आहे. 


बळीराजा बनवल्या जाणाऱ्या अन्नदात्याच्या पाठीचा कणा नैसर्गिक संकटाने मोडून पडला असून या शेतकऱ्यांना सरकारने आधार व मदत देण्याची गरज असल्याचे धनंजय मुंडे आपल्या पोस्टमध्ये म्हणतात.


दोन दिवसांपूर्वी राज्य सरकारने जून ते ऑगस्ट दरम्यान पावसामुळे नुकसान झाले परंतु अतिवृष्टीच्या निकषात बसत नाही अशा शेती पिकांच्या नुकसानीच्या मदतीपोटी राज्यातील नऊ जिल्ह्यांना 755 कोटी रुपयांची मदत जाहीर केली व त्यामध्ये बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केवळ 17 लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली होती. यावरूनही धनंजय मुंडे यांनी संताप व्यक्त केला होता. त्याचबरोबर राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित क्षेत्राला मदत करतानाही बीड जिल्ह्यात पडलेला पाऊस त्या निकषात बसत नसल्याचे सांगून जिल्ह्याला मदतीतुन वगळले होते. त्याचीही आठवण करून देत धनंजय मुंडे यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठवाड्यातील व बीड जिल्ह्यातील नुकसान बघण्यासाठी प्रत्यक्ष येण्याचे आवाहन केले आहे, याची दखल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री घेणार का? खरंच मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रति आत्मीयता दाखवून ओला दुष्काळ किंवा तत्सम विशेष मदतीची राज्य सरकारच्या माध्यमातून घोषणा करणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

धक्कादायक घटना-परळीतील पवनराजे अर्बन निधीच्या अध्यक्षाची आत्महत्या

बीड लोकसभा निवडणुक : परळी वैजनाथ मतदारसंघात कुठे किती झालं मतदान (संपुर्ण आकडेवारी)

ज्युस सेंटरमध्ये ग्राहक युवतींचा व्हिडीओ व फोटो शुट करण्याच्या कारणावरून नागरिक संतप्त

महिलांनो सावधान: फेसबुकवरील चॅटिंग पडू शकते महाग!

दोन मृत्यूमुखी दोन जखमी

MB NEWS:खळबळजनक घटना : परळीतील कंत्राटदाराची हत्या !

मोंढ्यातील अस्ताव्यस्त व बेशिस्त गाडेवाले, : यावर नियंत्रण कधी येणार?

खून प्रकरणातील वान्टेड आरोपी पकडला

कमळाला मतदान केले म्हणून कुटुंबावर घरात घुसून हल्ला !