परळीकरांनी केलं आत्मीय स्वागत....!!!

इमेज
  पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नीनं घेतलं परळीत ज्योतिर्लिंग वैद्यनाथ दर्शन परळी वैजनाथ, एमबीन्यूज वृत्तसेवा.... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन नरेंद्र मोदी यांनी पाचवे ज्योतिर्लिंग श्री वैद्यनाथ मंदिर येथे दर्शन घेतलं.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी  या आज मंगळवारी (23 डिसेंबर) परळी वैजनाथ येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या प्रभू वैद्यनाथांचे  दर्शन घेतलं.  जशोदाबेन यांनी नम्रपणे दौरा चांगला घडवल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.12 ज्योतिर्लिंगांपैकी पाचवे ज्योतिर्लिंग असलेल्या वैद्यनाथ मंदिराला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आरोग्य निरामय राहण्यासाठी देशभरातून भाविक परळीत वैद्यनाथ दर्शनासाठी येतात. या मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन मोदी मंगळवारी दुपारी कुटुंबीयांसह आल्या होत्या. पारंपरिक पद्धतीनं विधिवत पूजा अभिषेक त्यांनी केला. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रशासन आणि सर्व संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी आभार मानले. यावेळी दर्शनासाठी प्रशासनानं चोख व्यवस्था ठेवली होती. यावे...

MB NEWS-शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा

 शेतकऱ्यांना पंचनामे न करता तात्काळ मदत व विमा जाहीर करा - किसान सभा




परळी / प्रतिनिधी


परळी तालुक्यामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे कुठलाही भेदभाव न करता कुठलेही निकष न लावता सरसकट परळी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ मदत व विमा लागू करावा अशी मागणी किसान सभेच्यावतीने करण्यात आली आहे.


परळी शहर व तालुक्यात मागच्या काही दिवसापासून पावसानं रुद्ररूप धारण केलं असून परळी तालुक्यामध्ये शेतकरी सोयाबीन काढणीसाठी कापूस वेचणीसाठी कामाला लागले असताना गुरुवार दि 20 रोजी अचानक पावसाने खूप मोठ्या प्रमाणात हाहाकार माजविला. ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सोयाबीन एक तर पाण्यात वाहून गेले आहे किंवा सोयाबीन मध्ये पाणी साचले आहे अनेकांचे सोयाबीन काढून ढिग तयार केलेले सुद्धा पावसाच्या पुरामध्ये वाहून गेले आहेत.यातच गाढे पिपळगाव येथील 25 वर्षीय युवकाचा पुराच्या पाण्यात वाहून जात दुर्दैवी मृत्यू झाला. अनेकांचे पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले तर काही वीज पडून मृत्यू झाले. सध्या दिवाळीचा सण तोंडावर असताना शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागणार असून कुठल्याही पद्धतीचे नियम निकस न लावता पंचनामे न करता शेतकऱ्यांना मदत द्यावी पीक विमा तात्काळ मंजूर करून या अतिवृष्टीमुळे झालेली जीवित व पशुधन हानी यांच्या परिवारास मदत देण्यात यावी अशी मागणी किसान सभा परळी तालुक्याच्यावतीने कॉ.भगवान बडे,कॉ.मुक्तेश्वर कडभाने, कॉ.रुस्तुम माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

BREAKING NEWS: राडा ;एक ठार

संतापजनक: परळीत पुन्हा अमानवी कृत्य.....

जळगव्हाण तांडा येथील सरपंचांचा आपघाती मृत्यू...

दुर्दैवी घटना.....

MB NEWS-अपघातात एक पायच निघाला बाजूला !

मोठी बातमी: उड्डाणपुलावरील वाहतुकीबाबत च्या निर्णयात अंशतः बदल !

परळीतील एका. गुन्हेगारी टोळीविरुद्ध कठोर कारवाई!